"उबाठा गटाची बोगसगिरी..."; आमदारांच्या सह्यांबाबत संजय शिरसाटांची प्रतिक्रिया

    09-Dec-2023
Total Views | 56

Sanjay Shirsat


नागपूर :
एखाद्या कामानिमित्त आमदारांच्या घेतलेल्या सह्या मुद्दाम दुसऱ्या ठरावाला जोडण्याची बोगसगिरी उबाठा गटाने केली असल्याचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. शनिवारी शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी पार पडल्यानंतर शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नको अशी भुमिका घेत शिंदे गटाच्या २३ आमदारांच्या पत्रावर सह्या आहेत, असा युक्तीवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. यावर संजय शिरसाट म्हणाले की, "मुळात ती बैठक झालीच नसून आम्हाला प्राप्त झालेल्या त्यांच्याकडील कागदपत्रांमध्ये अनेक खाडाखोड आहे. तसेच एखाद्या कामानिमित्त आमदारांच्या घेतलेल्या सह्या मुद्दाम दुसऱ्या ठरावाला जोडण्याची बोगसगिरी त्यांनी केली आहे," असे ते म्हणाले.
 
पुढे ते म्हणाले की, "एकीकडे बैठक झाली असे ते म्हणतात आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्टात बैठकीला हे लोक उपस्थित नव्हते असेदेखील म्हणतात. आताच्या सुनावणीत त्यांचे प्रश्न आणि आमच्या उत्तरांमध्ये तफावत बघायला मिळत आहे. त्यामुळे आता सुनावणीदरम्यान आता सगळं खरं खोटं होणार आहे," असेही ते म्हणाले.



अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121