ज्ञानवापी प्रकरणात मुस्लीम पक्षाला धक्का; अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

    19-Dec-2023
Total Views | 157

 gyanwapi
 
लखनऊ : ज्ञानवापी परिसराच्या मालकी हक्कावरुन अलाहाबाद उच्च न्यायालयाने दि. १९ डिसेंबर, मंगळवारी आपल्या आदेशातून मुस्लिम पक्षाला मोठा धक्का दिला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने १९९१ च्या खटल्याच्या सुनावणीस मान्यता दिली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली आहेत.
 
न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या खंडपीठाने सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड आणि अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीच्या मालकी विवाद प्रकरणांना आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या. न्यायालयाने म्हटले की, "खटला देशातील दोन प्रमुख समुदायांना प्रभावित करतो. त्यामुळे आम्ही वाराणसी जिल्हा ट्रायल कोर्टाला सहा महिन्यांत या खटल्याचा निकाल देण्याचे निर्देश देतो."
 
काशी विश्वनाथ ज्ञानवापी प्रकरणी १९९१ मध्ये वाराणसी न्यायालयात पहिला खटला दाखल करण्यात आला होता. याचिकेत ज्ञानवापी संकुलात पूजेची परवानगी मागितली होती. यानंतर सप्टेंबर १९९१ मध्ये केंद्र सरकारने प्रार्थनास्थळ कायदा लागू केला. या कायद्यानुसार, १५ ऑगस्ट १९४७ पूर्वी अस्तित्वात आलेल्या कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळाचे अन्य कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळात रूपांतर करता येणार नाही, असे या कायद्यात म्हटले आहे. जर कोणी असा प्रयत्न केला तर त्याला एक ते तीन वर्षांचा तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.
 
याच कायद्याचा आधार घेऊन ज्ञानवापी प्रकरणात मशीद समितीने उच्च न्यायालयात याचिका रद्द करण्याची मागणी केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. २०१८ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात उच्च न्यायालयाने लावलेली स्थगिती हटवली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर २०१९ मध्ये वाराणसी न्यायालयात पुन्हा या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121