नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या एकूण ३४ खासदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेतील कामकाजादरम्यान, गोंधळ घातल्याप्रकरणी ३२हून अधिक खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. काँग्रेसचे संसद समितीचे सदस्य अधीर रंजन चौधरी, डीएमके खा. टी. आर. बालू यांच्यासह अन्य खासदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, खासदारांच्या निलंबनाबाबत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सभागृहात प्रस्ताव ठेवला होता. सदर प्रस्ताव मान्य करण्यात आला असून याआधीदेखील विरोधी पक्षाच्या एकूण १४ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. एकंदरीत, संसद अधिवेशनात आतापर्यंत एकूण ४७ विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. तर यापैकी ३० खासदार संपूर्ण सत्राकरिता निलंबित करण्यात आले आहेत.