स्वतः खासदार असूनही राऊतांनी केली घुसखोरांची पाठराखण!, म्हणाले,

    14-Dec-2023
Total Views | 52

Sanjay Raut


नवी दिल्ली :
हिवाळी अधिवेशनादरम्यान बुधवारी संसदेत घुसखोरीची घटना घडली. लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी खासदारांच्या बाकांवर उड्या घेतल्या आणि घोषणाबाजी केली. यावर आता उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
ते म्हणाले की, "आज ज्या तरुणांना पकडलं आहे त्यांचा मार्ग चुकला आहे. खरं तर ते ज्या भावना व्यक्त करत होते त्या देशाच्या भावना आहेत. महागाई, बेरोजगारी, अस्थिरता याविषयी अस्वस्थपणे त्यांच्या घोषणा सुरु होत्या. हल्ले करणारे मुलं बेरोजगार आहेत. त्यांना पकोडे तळायलाही कुठे जागा नाही."
 
"शेवटी वैफल्यग्रस्त होऊन जर तरुण या मार्गाने निघाला असेल तर ही अराजकाची सुरुवात आहे. त्यांच्या दृष्टीने ही क्रांती आहे आणि आमच्या दृष्टीने हा अतिरेक आहे. हा चुकीचा मार्ग आहे. या देशातील सुशिक्षित, बेरोजगार, वैफल्यग्रस्त तरुणांना दिशा देणं गरजेचं आहे. या तरुणांकडून झालेला भावनेचा उद्रेक हा देशासाठी घातक आहे," असेही ते म्हणाले आहेत.



अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121