पदवीधर निवडणुकीसाठी मतदार नोंदणीची मुदत वाढवा; भाजयुमोची मागणी

    01-Dec-2023
Total Views | 28
BJP demands extension of deadline for graduate voter registration

मुंबई : आगामी शिक्षक, सिनेट, पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी सुरू झाली आहे. परंतु, मतदारांना अर्ज भरताना विविध समस्या येत असल्याने अनेकजण मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे मतदार नोंदणीची अंतिम मुदत वाढवण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी करण्यात आली आहे.
 
१ नोव्हेंबरच्या पदवीधर मतदारांच्या अधिसूचनेत ओटीपी पडताळणी अनिवार्य असल्याचा उल्लेख नव्हता. या अधिसूचनेनंतर ३ दिवसांनी ओटीपी पडताळणी अनिवार्य करण्यात आली. आधीच्या सूचनेच्या ५ दिवसानंतर एक स्वतंत्र अधिसूचना जारी करण्यात आली होती, ज्यात नमूद केले होते की ऑनलाईन भरलेले सर्व फॉर्म ऑफलाईन देखील भरलेले आहेत. ५ दिवसानंतर दुसऱ्या अधिसूचनेत नमूद केलेले कलम मागे घेण्यात आले, असे भाजयुमोने म्हटले आहे.
 
मतदारांना नोंदणी करण्याची प्रक्रियाच १० नोव्हेंबरपर्यंत समजली. तसेच सणासुदीमुळे मतदारांना अर्ज भरता आले नाहीत. त्यात तांत्रिक अडचणीमुळे नोंदणीची प्रक्रिया योग्य प्रकारे झाली नाही. त्यामुळे लाखो मतदार या निवडणुकीपासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे मतदार नोंदणीची अंतिम मुदत वाढवण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने केली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121