नवी दिल्ली : तेलंगणामध्ये गुरुवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६३.९४ टक्के मतदान झाले आहे. निवडणुकीचा मतमोजणी येत्या रविवारी म्हणजे ३ डिसेंबर रोजी होणार आहे.तेलंगणा राज्य विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६३.९४ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील 13 नक्षलबहुल केंद्रांवर दुपारी 4 वाजता मतदान संपले, मात्र राज्यातील इतर भागातील मतदान केंद्रांवर मोठ्या संख्येने मतदार रांगेत राहिले. अशा स्थितीत एकूण मतदानाची टक्केवारी वाढण्याची अपेक्षा आहे.
सत्ताधारी बीआरएससह भाजप, काँग्रेस, सीपीआय, एआयएमआयएमचे एकूण 2,290 उमेदवार रिंगणात आहेत. 2018 मध्ये बीआरएसला सर्वाधिक 88 जागा मिळाल्या होत्या. यावेळी प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, त्यांचे मंत्री पुत्र के. टी. रामाराव, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी आणि भाजपचे लोकसभा सदस्य बी. संजय कुमार आणि डी अरविंद यांचा समावेश आहे. लंगणाच्या स्थापनेपासून राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले के. चंद्रशेखर राव यांच्यासमोर सत्ता कायम ठेवून हॅटट्रीक साधण्याचे आव्हान आहे. त्याचवेळी काँग्रेस आणि भाजप तेलंगणा सरकारच्या भ्रष्टाचाराचा मुद्द्याद्वारे केसीआर यांचा पराभव करण्याचा दावा करत आहेत.