‘सीएए’ची नियमावली मार्च महिन्यापर्यंत तयार होणार

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र ‘टेनी’ यांची माहिती

    27-Nov-2023
Total Views | 128
Central Government on Amended Citizenship Act Bill

नवी दिल्ली :
सुधारित नागरिकत्व कायद्याची (सीएए) नियमावली पुढील वर्षी मार्च अखेरपर्यंत तयार होईल, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र ‘टेनी’ यांनी दिली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र ‘टेनी’ यांनी उत्तर प्रदेशातील ठाकुरनगर येथील मतुआ समुदायास संबोधित केले. यावेळी त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याची नियमावली पुढील वर्षी तयार होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या बहुप्रतिक्षित कायद्याचा वापर पुढील वर्षापासून होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्र सरकारने सुधारित नागरिकत्व कायद्याचे विधेयक ९ डिसेंबर २०१९ रोजी लोकसभेत तर ११ डिसेंबर रोजी राज्यसभेत मंजुर करवून घेतले होते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर १० जानेवारी रोजी त्याचे कायद्यात रुपांतर झाले होते. कायद्यात रुपांतर झाल्यानंतर त्याविषयी नियमावली निश्चित केली जाते. त्यासाठी लोकसभेच्या विधी समितीने ९ जानेवारी २०२४ ही अंतिम मुदत दिली आहे. त्याचवेळी राज्यसभेच्या विधी समितीने ३० मार्च २०२४ ही अंतिम मुदत दिली आहे. त्यानंतर सीएएचा वापर करता येणार आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्र ‘टेनी’ यांनी दिली आहे.

सीएएच्या विरोधकांनी जवळपास २२० याचिका दाखल केल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, सीएएविषयी केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची अडचण नाही. सर्वोच्च न्यायालयात या कायद्याविरोधात दाखल याचिकांवर येत्या ६ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

इकोसिस्टीमला पुन्हा पोटशूळ उठणार

सुधारित नागरिकत्व कायदा हा देशातील मुस्लिमांना देशातून बाहेर काढण्यासाठी असल्याचा अपप्रचार कथित पुरोगामी इकोसिस्टीमकडून मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. सीएएविरोधात दिल्लीतील शाहिन बाग परिसरात अनेक महिने आंदोलनाच्या नावाखाली तमाशाही बसविण्यात आला होता. त्यातूनच पुढे दिल्लीमध्ये हिंदूविरोधी दंगलही घडली होती. तरीदेखील सरकारने या कायद्याविषयी माघार घेतली नव्हती, आता कायद्याची नियमावली अंतिम टप्प्यात आली असतावा या इकोसिस्टीमला पुन्हा पोटशूळ उठण्याची दाट शक्यता आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121