मंत्रीमंडळ विस्तारानंतर दादा भुसे नाराज का झाले?

    15-Aug-2022
Total Views |

dada
 
मुंबई : राज्यातील फडणवीस - शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. भाजपकडून आणि शिंदे गटाकडून प्रत्येकी ९ मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. याच विस्तारात शिंदे गटाचे आमदार या मंत्रिमंडळ विस्तारावर नाराज असल्याच्या वावड्या उठत होत्या. याच आमदारांमध्ये एक महत्वाचे नाव असल्याचे सांगितले जात होते त्या म्हणजे ठाकरे सरकारमधील कृषिमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक असलेले दादा भुसे. मंत्रीमंडळात महत्वाचे खाते मिळाले नाही म्हणून दादा नाराज असल्याचे सांगितले जात होते पण आता स्वतः दादांनीच पुढेच येऊन आपल्या नाराजीचे खरे कारण सांगितले.
 
 
"प्रकृतीच्या कारणास्तव आपणच वेगळे खाते मिळावे अशी मागणी करत होतो"असे स्पष्टीकरण दादा भुसे यांनी स्वतःच दिले आहे. आजकाल आपल्याला प्रवासाचा, त्या दगदगीचा त्रास होतो त्यामुळे आपण स्वतः ठाकरे सरकारच्या काळातही आपल्याला कमी दगदगीचे खाते देण्यात यावे अशी मागणी शिंदे यांच्यामार्फत उद्धव ठाकरे यांना कळवली होती. याहीवेळी मी स्वतःच वेगळे खाते मिळावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती त्यामुळे आपण अजिबात नाराज नाही असे स्पष्टीकरण भुसे यांनी दिले.
 
फडणवीस - शिंदे मंत्रिमंडळ विस्तारात बंदरे आणि खनिकर्म हे खाते देण्यात आले आहे. "अशा प्रकारे ज्या खात्याच्या कामांमध्ये कमी दगदग आहे असेच खाते मागितले याला अजून एक कारण म्हणजे जेव्हा आपल्याला एखादी जबाबदारी विश्वासाने सोपवली जाते आणि आपण जर त्याला न्याय देऊ शकलो नाही तर आपल्यालाच वाईट वाटते त्यामुळे आपण जे खाते आपल्याला मिळाले आहे त्यावर आपण खुश आहोत" असेही आपल्या स्पष्टीकरणात भुसे यांनी सांगितले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121