मुंबई : १८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांमुळे राज्य विधीमंडळाचे १८ तारखेपासूनच सुरू होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय संसदीय कार्य विभागाने विधानमंडळ सचिवालयाला या बद्दल सूचित केले आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सर्व सदस्यांना याबाबत सूचित करण्यात आले आहे.
विधिमंडळाच्या अधिवेशनाची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असेही जाहीर करण्यात आले आहे. शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरची सुनावणी पुढे ढकलली गेल्यामुळे याही निकालाचे काय होते हे बघणे महत्वाचे आहे.