‘ईडी’ कार्यालयासमोर काँग्रेसकडून जाळपोळ

राहुल गांधींची तिसर्‍या दिवशी चौकशी भ्रष्टाचार लपविण्यासाठी हिंसा : भाजप

    16-Jun-2022
Total Views |

jalpoal
 
 
 
 
 
नवी दिल्ली : ‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून बुधवारी ’ईडी’ कार्यालयाबाहेर जाळपोळ करण्यात आली. दरम्यान, भ्रष्टाचार लपविण्यासाठी काँग्रेसकडून हिंसेचा मार्ग अवलंबिला जात असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केली. ‘नॅशनल हेराल्ड’ आर्थिक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची सलग तिसर्‍या दिवशी ‘ईडी’द्वारे चौकशी करण्यात आली.
 
 
 
चौकशीच्या पहिल्या दिवसापासून काँग्रेसतर्फे निदर्शने आणि आंदोलन करण्यात येत आहे. चौकशीच्या तिसर्‍या दिवशी काँग्रेस कार्यकर्त्यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम मार्गावरील ‘ईडी’ मुख्यालयासमोर निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मुख्यालयाबाहेर टायर जाळून विरोध करण्यात आला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून राहुल गांधी यांच्या चौकशीमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांना चौकशीदरम्यान अमानवी वागणूक देण्यात येत असल्याचाही आरोप चौधरी यांनी केला आहे.
 
 
 
भाजपतर्फे काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली. भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी पत्रकार परिषदेत म्हणाले की, “७० वर्षांच्या कार्यकाळात काँग्रेस दररोज खालच्या पातळीवर उतरत असल्याचे दिसत आहे. याच पक्षाच्या दोन पंतप्रधानांनी स्वत:च स्वत:ला ‘भारतरत्न’ प्रदान करून घेतले होते. महात्मा गांधी ते सोनिया गांधी असा काँग्रेस पक्षाचा प्रवास पाहता काँग्रेस पक्ष निम्नस्तरावर गेल्याचे स्पष्ट होत आहे” हे प्रकरण भारतीय राजकारणातील अभूतपूर्व प्रकरण असल्याचे त्रिवेदी यांनी सांगितले.
 
 
 
ते पुढे म्हणाले की, “हा विषय संपुआ सरकारच्या काळात सुरू झाला होता. राजकीय पक्षाकडून आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी हिंसाचाराचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. काँग्रेस पक्ष केवळ एका कुटुंबापुरता उरल्याचे आता स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे ही केवळ भारतातील जनतेसाठीच नाही, तर काँग्रेस कार्यकर्त्यांसाठीही चिंतेची बाब आहे,” असे त्रिवेदी यांनी यावेळी नमूद केली.
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121