निवडणूक आयोगाच्या अटीचा तब्बल १ लाख, १७ हजार मतदारांना फटका

मतदार यादीत फोटो नसल्याने मतदानापासून राहावे लागणार वंचित अट शिथिल करण्याची भाजपची मागणी

    16-Jun-2022
Total Views |

KD
 
 
 
 
 
डोंबिवली : “निवडणूक आयोगाने मतदार यादीत फोटो नसल्यास मतदान करता येणार नाही, अशी अट घातल्याने डोंबिवलीतील तब्बल १ लाख, १७ हजार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहे. त्यामुळे ही अट शिथिल करण्यात यावी,” अशी मागणी भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केली आहे. तसेच, काही कारणाने मतदार यादीत फोटो नसल्यास मतदारांना मतदानापासून वंचित न ठेवण्याची मागणीही कांबळे यांनी केली आहे.
 
 
 
निवडणूक आयोगाने घातलेल्या अटीमुळे एक लाखांहून अधिक नागरिक मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार असल्याने भाजपने याविषयी पुढाकार घेतला आहे. भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी यासंदर्भात पु. भा. भावे सभागृहातील निवडणूक कार्यालयाला बुधवारी भेट देत निवडणूक मतदार नोंदणी अधिकार्‍यांशी चर्चा केली. मनपा व इतर निवडणुकांवेळी असलेल्या याद्या ग्राह्य धराव्यात. तसेच,ज्या मतदारांचे फोटो मतदार यादीत नाही त्यांच्या घरी ‘बीएलओ’ पाठवून त्यांचे फोटो घ्यावेत, अशी मागणीही कांबळेंनी मतदार नोंदणी अधिकार्‍यांकडे केली. यावेळी भाजपचे डोंबिवली पश्चिम युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णा पाटील, कल्याण जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस पवन पाटील, अमोल दामले, मनीष शिंदे, गणेश निंबाळकर, प्रशांत पाटेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
 
सर्वच पक्षांना फटका बसण्याची शक्यता
 
मतदारांचा फोटो नसल्यामुळे ३१ मे २०२२ पर्यंत डोंबिवलीतील १४३ मतदार संघातील १ लाख, १७ हजार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. २०२१ मध्ये ३८ हजार, ३१ मेपूर्वी ४४ हजार आणि ३१ मे नंतर २५ नावे कमी झाली. अशा पद्धतीने एकूण १ लाख, १७ हजार नावे कमी झाली आहेत. आधीच डोंबिवली विधानसभा मतदारसंघात सरासरी ४० टक्क्यांपेक्षाही कमी मतदान होते. त्यात मतदारांची नावे वगळण्यात आल्याने त्याचा सर्वच पक्षांना फटका बसण्याची शक्यता आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121