सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धाब्यावर

मनसेच्या तक्रार अर्जामुळे पोलिसांसमोर पेच

    01-May-2022
Total Views | 145

sc of india
 
 
 
ठाणे: मशिदींवरील भोंगे दि. ३ मेपर्यंत काढले नाही, तर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या विरोधात मुंब्य्रातील मौलवींनी शांततेचे आवाहन करून सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करण्याचे दावे केले होते. मात्र, हे दावे मनसेने फोल ठरवले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत भोंगे लावण्यावर बंदी असतानाही मुंब्र्यात भल्या पहाटे सुरू असलेल्या अजानचा व्हिडिओ सोशल मीडियात ‘व्हायरल’ करून मनसेने मुंब्रा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
 
 
 
मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे सर्वोच्च न्यायालयाची अवहेलना केल्याची लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत (भोंगे) ‘लाऊडस्पीकर’वर बंदी असताना शनिवारी मुंब्रा भागात पहाटे ४ वाजून ५६ मिनिटाला मोठ्या आवाजात अजान पठण सुरू असल्याचे व्हिडिओ काही जणांनी मनसेकडे पाठवले आहेत. तेव्हा, हा प्रकार न्यायालयाच्या निर्णयाची अवहेलना असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे. तसेच, सोशल मीडियातही हे व्हिडिओ ‘व्हायरल’ करून पोलिसांना कारवाईचे आवाहन केले आहे.
 
 
हा उफराटा न्याय का?
कोणत्याही अटी-शर्तींचे पालन न करता मुंब्रा भागात भोंगे लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंब्र्यात काही मौलवींनी पत्रकार परिषद घेऊन, शांततेचे आवाहन करीत सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन केले जाईल, असे सांगितले होते. मात्र, तसे चित्र दिसत नसून एकाला एक न्याय आणि या मंडळींना दुसरा न्याय का? असा सवाल अविनाश जाधव यांनी केला आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121