बीडीडीकरांना जितेंद्र आव्हाडांनी दिला दम! म्हणाले...

...तर पोलीस बळाचा वापर करणार!

    05-Apr-2022
Total Views | 326

JIT

मुंबई : ना. म. जोशी मार्ग येथील बिडीडी चाळीचे काम कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, अशी ग्वाही गृहनिर्माणमंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. बिडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी ते प्रकल्पस्थळी आले होते. यावेळी उपस्थित चाळवासियांसोबत त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, अनिल डिग्गीकर, उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा, डॉ. योगेश म्हसे, मुख्य अधिकारी, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, म्हाडा उपस्थित होते.

"तुमच्या हिताच्या गोष्टी या माणुसकीच्या नात्यांने बोलतोय. ॲग्रिमेंट तयार करतांना सगळ्यांच्याच मागण्यांचा विचार करण्यात आला आहे. लग्ना समारंभांसाठी हॉल दिला. वेळेत प्रकल्प पूर्ण करायचा आहे. शासनाने सर्व दिले आहे. आताही काही लोक अडून बसले आहेत. देव देते आणि कर्म नेते असे करू नका. ज्या बिल्डिंग रिकाम्या कराव्या त्या रिकाम्या करून द्याव्यात. पावसाळ्याच्या आधी त्या बिल्डिंग पाडल्या जातील आता प्रोजेक्ट थांबवू नका नाही तर बळाचा वापर करावा लागेल.", असेही आव्हाड म्हणाले. 



"आम्ही पण चाळीतूनच आलो आहोत. कोणाचीही फसवणूक होणार नाही. काही लोक या प्रकल्पात आडकाढी आणत असतील तर ते खपवुन घेतले जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. यापुर्वी २८१ कुटुंब स्थानांतरीत झाले आहेत तर ६८ लोकांनी ॲग्रीमेंट करून घर सोडले नाही, या लोकांनी सहकार्य करावे असे डॉ.आव्हाड यांनी आवाहन केले आहे. आव्हाड पुढे म्हणाले, इथे काय काम चालू आहे ते बघायला आलो आहे. इथल्या रहिवाशांना जुन्या १८० चौ.फु च्या घरातून पाचशे चौ.फु घरात जायला मिळणार आहे. पक्के आणि सुसज्ज घरे मिळणार आहेत. पुढची पिढी चांगल्या वातावरणात वाढली पाहिजे ही शासनाची इच्छाआहे.", अशी भूमिका गृहनिर्माण मंत्र्यांनी यावेळी घेतली. 


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121