प्रक्षोभक, वादग्रस्त, भडक मथळे देणे टाळा!

मंत्रालयांने जारी केल्या खासगी वाहिन्यांयाठी सूचना

    25-Apr-2022
Total Views | 70
 

anurag
 
 
मुंबई : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शनिवारी खासगी वाहिन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. खासगी प्रसार माध्यम वाहिन्यांनी खोटे, बनावट दावे आणि सनसनाटी निर्माण करणारे भडक मथळे देणे टाळावे, असे या मार्गदर्शक सूचनांमधून सांगितले आहे. सर्वांनी, केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स (नियमन) कायदा, १९९५मधील ‘कलम २०' च्या सगळ्या नियमांचे पालन करावे, विशेषतः कार्यक्रमाविषयी असलेल्या संहितांचे पालन केले जावे, अशी सूचना या सविस्तर मार्गदर्शक सूचनांमध्ये करण्यात आली आहे.
 
गेल्या काही काळात अनेक उपग्रह वाहिन्यांवरील कार्यक्रमात कार्यक्रमाचा दर्जा, आणि पातळी खालावली असून, यातील भाषा, असभ्य आणि बदनामीकारक तसेच ज्यात अनेकदा जातीय रंगही आढळल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः युक्रेन-रशिया युद्ध आणि उत्तर-पश्चिम दिल्लीत झालेल्या घटनांचे वार्तांकन ज्या पद्धतीने झाले, त्याचा उल्लेख करत, यासंदर्भातल्या कार्यक्रमात, विहित संहितेचे उल्लंघन झाल्याचे, या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. या हिंसाचाराच्या घटनांचा उल्लेख करत, मंत्रालयाने याविषयी गंभीर चिंता व्यक्त करत, हे कार्यक्रम केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स (नियमन) कायदा, 1995 चे उल्लंघन करत असल्याचे म्हटले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121