चीनची नवीन कुरापत : गलवान खोऱ्यातील 'जवान' चीनचा ऑलिम्पिक मशालवाहक

चीनची नवीन कुरापत

    03-Feb-2022
Total Views | 65
                                              
Olympic torchbearer
 
 
नवी दिल्ली: गलवान खोऱ्यात झालेल्या भारत - चीन संघर्षात जखमी झालेल्या जवानास बीजिंग ऑलिम्पिक २०२२ साठी मशालवाहक निवडला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. क्वी फाबाओ असे या जवानाचे नाव आहे. हा चीनच्या लिबरेशन आर्मीचा जवान आहे. जून २०२० मध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. मागच्याच वर्षी त्याला ' हिरो रेजिमेंट कमांडर ' या पदवीने सन्मानित केले गेले होते.
 
४ फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या ऑलिम्पिक ज्योत समारंभात तो चीनचा मशालवाहक म्हणून सामील झाला होता. जून २०२० मध्ये झालेल्या या गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर दोन्ही देशांकडून शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चेने तोडगा काढण्यासाठी विविध पातळ्यांवर चर्चा सुरु आहेत, पण चीन मात्र या घटनेचा वापर करून आपले वर्चस्व प्रस्थापित करू पाहत आहे. सातत्याने या मुद्यावरून त्याने कुरापती काढण्याचे धोरण अजून चालूच ठेवले आहे.
 
अमेरिकेच्या परराष्ट्र समितीच्या एका वरिष्ठ सभासदाने या घटनेबद्दल चीनचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. " गलवान खोऱ्यातील जवानास ऑलिम्पिक मशालवाहक म्हणून निवडण्याचे चीनचे हे कृत्य अतिशय निदनीय आहे. ह्या घटनेचा तसेच उघूर लोकांच्या नरसंहाराचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. उघूर स्वातंत्र्याचा आणि भारताच्या सार्वभौमत्वाचा अमेरिका कायमच पुरस्कार करत राहील" असे या वरिष्ठ सभासदांनी ट्विट करून म्हटले आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121