कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ‘रास्ता रोको’

सोमवारी कामगार आयुक्त कार्यालयात संयुक्त बैठक

    11-Dec-2022
Total Views | 68
 
प्रशांत ठाकूर
 
 
 
 
 
 
पनवेल : आजिवली गावस्थित असलेल्या ‘आयरन माउंटन’ कंपनीने कामगारांना कामावरून कमी केल्याने त्या विरोधात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन करत कंपनी व्यवस्थापनाला इशारा दिला. त्यामुळे कामगारांच्या संदर्भात आ. प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी कामगार उपायुक्त यांच्यासमवेत व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासनाची बैठक होणार असून कामगारांना कामावर पूर्ववत घ्या नाही, तर यापेक्षा मोठे आंदोलन करण्याचा गर्भित इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला.
 
 
 
 
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भाजपचे तालुका सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष पाटील, आप्पा भागीत, राम गोजे, भाजपचे गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, युवा नेते अनिल पाटील, तानाजी पाटील, शिवाजी माळी, प्रवीण ठाकूर, महेंद्र गोजे, अनंतबुवा पाटील, रवी शेळके, संदेश गोजे, यांच्यासह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121