भारताचे संविधान चिरकालिक

ज्येष्ठ लेखक रमेश पतंगे यांचे प्रतिपादन

    28-Nov-2022
Total Views | 78

भारताचे संविधान
 
 
डोंबिवली : भारताचे संविधान हे मौलिक शाश्वत तत्वांवर आधारित आहे. त्यामुळेच ते चिरकालिक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक तथा हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे यांनी केले. डोंबिवली ग्रंथ संग्रहालय, विवेक प्रकाशन आणि टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रमेश पतंगे लिखित ‘आपले संविधान : (तत्वविचार-मूल्य संकल्पना-ध्येयवाद)’ या भारतीय संविधानावर भाष्य करणार्‍या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच डोंबिवली येथील टिळकनगर विद्या मंदिरातील पेंढरकर सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. प्रकाश साळशिंगीकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पतंगे म्हणाले, “न्याय, स्वातंत्र्य, समानता इ. संविधानाची मूलतत्वे प्रत्येक नागरिकाने आचरणात आणली पाहिजेत. आपण संविधानचे रक्षण केले तर संविधान आपले रक्षण करील.”
 
 
अ‍ॅड. प्रकाश साळशिंगीकर म्हणाले, “हे पुस्तक मनुष्य निर्माणाच्या प्रक्रियेतील एक महत्वाचे आयुध आहे ,”असे गौरवपूर्ण उद्गार काढले. “संविधानात आजपर्यंत 105 सुधारणा करण्यात आल्या. परंतु त्याच्या मूळ प्रारुपाला धक्का लागलेला नाही,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
 
 
डोंबिवली ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विष्णू सोमण तसेच टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी यांच्या हस्ते रमेश पतंगे व अ‍ॅड. प्रकाश साळशिंगिकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तपस्या नेवे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह आशीर्वाद बोंद्रे यांनी तर आभार विवेक प्रकाशनच्या शीतल खोत यांनी मानले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121