मातोश्री अमराठी लोकांचा "डिलिंग"चा अड्डा - निलेश राणे

    06-Aug-2021
Total Views | 154
matoshree_1  H



रत्नागिरी -
लांज्यामध्ये माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत तिथल्या शिवसैनिक ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी राणे यांनी नेहमीप्रमाणे शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.
 
 
यावेळी राणे म्हणाले, इथल्या शिवसेनेला घाबरण्याची काहीही गरज नाही. यांच्या खुर्च्या, यांची टेबलं-कपाटं सगळं मला माहित आहेत. एका दिवसात उध्वस्त करून टाकीन. तुम्हाला साधं खरचटलं तरी ते मलाच खरचटल्यासारखं आहे. आपण सगळे एक परिवार आहोत तुमच्यासाठी तुमच्या आधी मी रस्त्यावर उतरेन असे सांगत त्यांनी शिवसेनेला "अंगावर आल्यास शिंगावर घेण्याचा " अप्रत्यक्ष इशाराच दिला.
 
 
बाळासाहेब आठवतात? नाही आठवत !! जिथे बाळासाहेबच नाहीत त्या पक्षावर श्रद्धा कसली? आमची श्रद्धा त्या माणसावर होती, असे राणे म्हणाले. यावेळी त्यांनी मातोश्रीवरही आरोप केले. ते म्हणाले, आता काही शिल्लक ठेवलं नाही त्या भवनामध्ये. तुम्ही आजही जा, तुम्हाला सगळे अमराठी आतमध्ये दिसतील डिलिंगसाठी येणारे. मातोश्रीच्या आजूबाजूला जेवढी फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत तिकडे रूम आणि खालचे हॉल बुकींग होतात ते सगळे यांच्या व्यवहारांसाठी होतात. मराठी माणसासाठी होत नाहीत.
 
 
मराठी माणूस तिकडे मंत्रालयात गेलाच तर त्याला स्थानदेखील नाही. पण बाहेरचा माणूस बॅग घेऊन आला असेल तर त्याला आधी आतमध्ये घ्यायचा. आपला मराठी माणूस बाहेर तडफडला तरी चालेल!! काय स्थान आहे मराठी माणसाला शिवसेनेमध्ये? असा सवाल राणे यांनी केला. आज शिवसेना सत्तेमध्ये आली पण एक मराठी भवन बनवू शकलेले नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121