मुख्यमंत्री आले पण...मदतीच्या घोषणेसाठी प्रतीक्षाच

    21-May-2021
Total Views | 128

uddhdav_1  H x




सिंधुदुर्ग :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एकदिवसीय कोकण दौऱ्यावर तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागात पाहणी दौरा केला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीत आढावा बैठक घेतली. तर सिंधुदुर्गात काही बहगत पाहणी केली. मात्र दोन दिवसात अहवाल येईल. त्यावेळी मदती संदर्भात निर्णय घेण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी त्यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, नुकसानग्रस्तांना केंद्राच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्तांसाठी जे जे काही करता येणं शक्य होईल ते करण्यात येईल. नुकसानीचा आढावा जवळपास झाला आहे. पंचनामेही जवळपास झाले असून दोन दिवसात माझ्याकडे अहवाल येईल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल. सागरी किनार पट्टीच्या भागात कायमस्वरूपी काही सुविधा उभारणे गरजेचे आहे.



समुद्राजवळ जमिनीखालून विजेच्या वायरी टाकणे, वादळाच्या पार्श्वूभूमीवर अनेकांचं स्थलांतर करावं लागतं. अशा लोकांना कायमस्वरुपी निवारा देणं आदी गोष्टी करण्यात येणार आहे. हा कायमस्वरुपी आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार केंद्रानेही आम्हाला आवश्यक ती मदत द्यावी, मग ती निधीची असेल किंवा मंजुरीची असेल, ती मदत आम्हाला केंद्राने द्यायला हवी.



वारंवार अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान होते त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करणे गराजेचे आहे. वादळात आंबा, फळबागांचं नुकसान झालं आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्टीला मोठे फटके बसले आहेत. मच्छिमारांचंही नुकसान झालं आहे. प्रत्येकाला मदत केली जाईल. कुणालाही नाराज करणार नाही. दोन दिवसात अहवाल येईल. त्यावेळी निर्णय घेणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.


खरतर मुख्यमंत्री वादळानंतर तब्बल चार ते पाच दिवसांनी कोकणातील नुकसानग्रस्त भागात पाहणी दौर्यावर आले. या दौऱ्यातच मुख्यमंत्री भरीव मदत जाहीर करतील अशी आशा कोकणवासियांना होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी २ दिवसांनी ही घोषणा केली जाईल असे जाहीर केले. 
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121