आम्ही ११ हल्लेखोर आहोत; अमित शहा आणि योगी आदित्यनाथांना ठार मारू

    06-Apr-2021
Total Views | 343
amit shah_1  H




मुंबई - सीआरपीएफच्या मुंबई कार्यालयाला मंगळवारी एक ई-मेल प्राप्त झाला आहे. त्याव्दारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार मेलमध्ये धार्मिक स्थळांवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ आणि अमित शहा हे आत्मघाती हल्ल्यात ठार होतील असेही मेलमध्ये लिहिले आहे.


इंडिया टुडेच्या वृत्तानुसार मेलमध्ये 'आम्ही ११ आत्मघाती हल्लेखोर' आहोत, असे सांगून योगी आदित्यनाथ आणि अमित शाह यांची हत्या करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. यापूर्वी योगी आदित्यनाथ यांना एका संदेशाव्दारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. संदेशात असे सांगितले गेले होते की, २४ तासांमध्ये मी एके-47 बंदूकीने गोळ्या झाडून तुम्हाला मारणार आहे. आपण मला शोधू शकत असल्यास शोधा. त्यापूर्वी २१ नोव्हेंबर २०२० रोजी यूपी सरकारच्या आपतकालीन व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर धमकीवजा संदेश आला होता. पोलिसांनी या धमकी दिलेल्या नंबरचा तपास केल्यानंतर आरोपीला आग्रा येथून अटक करण्यात आली होता. धमकीचा संदेश पाठवणारा एक अल्पवयीन तरुण होता.
 
 

त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बॉम्बस्फोटाचा धोका होता. त्यांचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरधनाचे आमदार संगीत सोम यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना ठार मारण्याची चर्चाही या पत्रात लिहिलेली होती.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल अन्वर नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती. यतीश नावाच्या व्यक्तीने अनवर यांच्याविरूद्ध विट्ठल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. अनवरने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना सीएए आणि एनआरसी बीलामुळे मुस्लिमनांवर होणार परिणाम सांगून ठार मारण्याची धमकी दिली होती.



 
 
अग्रलेख
जरुर वाचा
समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे आज लोकार्पण

समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे आज लोकार्पण

राज्याची राजधानी मुंबई आण‍ि उपराजधानी नागपूर या दोन शहरांमधील अंतर केवळ आठ तासांवर आले आहे . या दोन शहरांना जोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या आण‍ि महत्त्वाच्या टप्प्याचे लोकार्पण आज, गुरुवार दि.५ जून रोजी होणार असून इगतपुरी येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील आमणे या ७६ किलोमीटर अंतराच्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याचवेळी सायन-पनवेल मार्गावरील वाशी खाडी पुलावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या नव्या खाडीपूल ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121