'चंदगड काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'मध्ये पट्टेरी वाघाने केली शिकार

    24-Nov-2021   
Total Views | 511
tiger_1  H x W:


मुंबई (अक्षय मांडवकर) - कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड संवर्धन राखीव वनक्षेत्रात वाघाचा (sahyadri tiger) अधिवास आढळून आला आहे. नुकताच या वनक्षेत्रात वाघाने शिकार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या दक्षिणेकडील वनक्षेत्रांमध्ये वाघांचा अधिवास (sahyadri tiger) असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

डिसेंबर, २०२० मध्ये राज्य सरकाराने ५ हजार ६९२ हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या 'आंबोली-दोडामार्ग काॅन्झर्वेशन रिझर्व्ह' आणि २२ हजार ५२३ हेक्टर क्षेत्रावरील 'चंदगड काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'ची घोषणा केली होती. त्यापूर्वी २९.५३ चौ.किमीच्या तिलारी काॅन्झर्वेशन रिझर्व्हची स्थापना झाल्याने या भागातील वन्यजीवांचा भ्रमणमार्ग जोडण्यासाठी मदत झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. या तिन्ही संवर्धन राखीव वनक्षेत्रांमध्ये वाघांचा (sahyadri tiger) अधिवास आहे. आंबोलीत यापूर्वी वाघांच्या पावलांचे ठसे आणि त्याने केलेल्या शिकारीचे अवेशष मिळाले आहेत. लाॅकडाऊनच्या काळातही आंबोली परिसरात नर वाघाचे (sahyadri tiger) छायाचित्र हे वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाले होते. आता तिलारी आणि आंबोलीच्या वनक्षेत्रांनी जोडलेल्या चंदगड कॉन्झर्वेशन रिझर्व्हमध्ये वाघाचा (sahyadri tiger) वावर निदर्शनास आला आहे.

नुकताच याठिकाणी वाघाने रेड्याची शिकार केल्याची माहिती वन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. वाघ हा रेड्याला झुडपांमध्ये फरफटत घेऊन गेला आणि त्याठिकाणी रेड्याला खाल्याची छायाचित्रे समोर आली आहेत. शिवाय तिथे वाघाच्या पायाची पदचिन्हे देखील सापडली आहेत. त्यामुळे वाघाच्या (sahyadri tiger) अधिवासावर शिक्कामोर्तब झाले आहे. काॅन्झर्वेशन रिझर्व्हच्या निर्मितीमुळे वाघांचा भ्रमणमार्ग जोडला जाऊन तो संरक्षित झाल्याचा हा परिणाम आहे. वाघ आणि इतर मोठ्या सस्तन प्राण्यांसाठी कॉरीडोर कनेक्टिव्हिटी (भ्रमणमार्गाची जोडणी) महत्त्वपूर्ण असल्याची माहिती सह्याद्रीतील व्याघ्र संशोधक गिरीश पंजाबी यांनी दिली. भ्रमणमार्ग अखंड ठेवल्याने प्रजनन क्षेत्रातील वाघ (sahyadri tiger) हे त्या क्षेत्राला जोडणाऱ्या इतर जंगलात आणि संरक्षित वन क्षेत्रात स्वत:चा स्वतंत्र अधिवास निर्माण करु शकतात, असेही त्यांनी अधोरेखित केले.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा
मोदी सरकारने ११ वर्षाच्या कारकिर्दीत देशाच्या सीमेसह अर्थव्यवस्था मजबूत केली तंत्रज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवले भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे गौरवोद्गार

मोदी सरकारने ११ वर्षाच्या कारकिर्दीत देशाच्या सीमेसह अर्थव्यवस्था मजबूत केली तंत्रज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवले भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे गौरवोद्गार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकसित भारताच्या अमृतकाळामध्ये सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची नवी यात्रा सुरु केली आहे. मोदी सरकारच्या प्रत्येक योजनेमध्ये जनकल्याण, सामान्य माणसाचे जीवन सुखकर करण्यासाठीच्या योजना तसेच देशाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा हेतू आहे. गेल्या ११ वर्षात मोदी सरकारने देशाच्या सीमेसह, अर्थव्यवस्था मजबूत केली. तसेच तंत्रज्ञानाला सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवले, असे गौरवोद्गार भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत काढले...

पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

वादळी व संततधार पाऊस किंवा अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे वीज अपघाताची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सतर्क राहावे. तसेच पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती, धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा स्थितीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121