मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली येथे कृषी कायद्याविरोधात आंदोलन होत आहे. यावर माध्यमांशी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधताना म्हटले की, कृषी कायद्यावर आंदोलन हा ढोंगीपणा आहे.
केंद्राने आता केलेले कायदे महाराष्ट्राने २००६ मध्येच केलेले आहेत. फडणवीस माध्यमांशी संवाद साधत म्हणाले की, कृषी कायद्याला विरोध होत आहे. हेच कायदे महाराष्ट्रात 2006 साली झालेत, शेतकरी फसवला गेला तर महाराष्ट्रात कुठे जाता येत नाही. मात्र केंद्राने त्यासाठी फोरम बनवलं आहे तिथे त्याला न्याय मिळेल. पण कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे ते वाहत्या गंगेत हात धुण्यासारखं आहे.
तसेच २०१९ साली महाराष्ट्र एफ डी ए मध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरवर होते . आता ते फार खाली गेले आहे. चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र हे आरबीआयने स्पष्ट सांगितले आहे. आम्ही सर्वात पुढे आहोत असे सांगणे सरकारचे पोके दावे आहेत . लॉकडाउनमध्ये भरमसाठ बिलं आली त्यात सूट देऊ असे सरकारने म्हटले, मात्र सरकारचं सामान्य माणसाला चारपट आलेले बिल भरले नाहीत , तर त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे अस म्हणत आहेत. हा निर्णय सरकारने घेतला आहे. हे फार चुकीचं आहे. ग्रामपंचायत निवडणूकित अपयश आल्याने, ते आता वसुली करत, लोकांचे लाईट कट करत आहेत. दुसरीकडे विकासकांना बिल्डराना वेगवेगळ्या सूट देऊन हे सरकार त्यांचा फायदा करत आहे असे फडणवीस म्हणाले.
आमचा बाळासाहेब यांच्या नावाला कधीच विरोध नाही.मात्र ज्या ठिकाणी वाद निर्माण होईल अश्या ठिकाणीही हे सरकार नावं देत आहे. त्यामुळे वाद होईल त्या ठिकाणी नाव देण्याची मागणी करू नये. दक्षिण मुंबईत पहिला पूर्णाकृती पुतळा होत आहे त्याला विरोध करणे चुकीचे आहे. तिथे कुठलाही वाद निर्माण करणे चुकीचे आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा मुंबईतच होणार त्याने काही ट्राफिक होणार नाही.
तसेच पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवसेनेने मतांसाठी लोटांगण घातले आहे. आता टिपू सुलतान जयंती साजरी करणार आहेत उद्या ओरंगाजेब याचीही करा. कार चालवणे सोपे असते, पण सरकार चालवताना ट्रॅफिक थांबवता येत नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंवरही फडणवीस यांनी निशाणा साधला. मराठी माणसासाठी आम्ही लढत राहणार. तसेच ब्रिस्बेन येथे अजिंक्य राहणे यांच्या नेतृत्वात जो करिश्मा केला आहे त्याबद्दल अजिंक्य राहणे व टीमच अभिनंदन असेही फडणवीस म्हणाले