"होय आम्ही नवीन! पण कधी केम छो वरळी..."; संदीप देशपांडे आणि संजय राऊतांमध्ये जुंपली

    23-Jun-2025
Total Views | 73


मुंबई :
होय आम्ही नवीन आहोत पण कधी केम छो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत, अशी जहरी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांवर केली आहे. एकीकडे मनसे आणि उबाठा गटाच्या यूतीच्या चर्चा सुरु असताना या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे.




"संदीप देशपांडे राजकारणात उशीरा आले आहेत. ठाकरे कुटुंबाला मी अनेक वर्षे ओळखतो. त्यामुळे काय होणार आणि काय होणार नाही हे माझ्याइतके कुणालाच माहिती नाही. राजकारणात माणसाने कायम संयमी आणि आशावादी असले पाहिजे. काही लोकांना अजून त्याचे प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. राजकारणात नुसता उथळपणा करून चालत नाही," अशी टीका संजय राऊतांनी केली होती.


यावर संदीप देशपांडे यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, " होय आम्ही नवीन आहोत पण कधी केम छो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत. जिलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही. मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी वीस हजार केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाही. आम्हाला अभिमान आहे आम्ही नवीन आहोत. तुम्ही जुने असून काय उपटली?" असा सवाल त्यांनी राऊतांचे नाव न घेता केला.




'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
नवी मुंबई विमानतळ सप्टेंबर अखेरीस सुरु होणार ; राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा

नवी मुंबई विमानतळ सप्टेंबर अखेरीस सुरु होणार ; राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्द्घाटन सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होण्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली. हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे विमानतळ असून एकाचवेळी ३५० विमाने या विमानतळावर उभी करता येतील एवढी क्षमता याची आहे. तसेच वर्षाला सुमारे ९ कोटी प्रवासी हवाई वाहतुकीचा आनंद यामुळे घेऊ शकतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. या विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होत आला असून त्याचे उ‌द्घाटन सप्टेंबरअखेरीस केले जाणार आहे...

बुलेट ट्रेन प्रकल्पात दमण गंगा नदीवरील पूल पूर्ण ; बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पूर्ण झालेला १६ वा नदीपुल

बुलेट ट्रेन प्रकल्पात दमण गंगा नदीवरील पूल पूर्ण ; बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पूर्ण झालेला १६ वा नदीपुल

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात दमण गंगा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी गुजरातमध्ये नियोजित २१ नदी पुलांपैकी हा सोळावा नदी पूल आहे. वलसाड जिल्ह्यात असलेले सर्व पाचनदी पूल आता पूर्ण झाले आहेत. संपूर्ण कॉरिडॉरवर एकूण २५ नदी पूल बांधले जात आहेत. वलसाड जिल्ह्यातील एमएएचएसआरमार्ग दादरा आणि नगर हवेलीमधील 4.3 किमीसह सुमारे ५६ किमी लांबीचा आहे. हा मार्ग जारोली गावातून सुरू होतो आणि वाघलदरा गावात संपतो. या मार्गात वापी बुलेट ट्रेन स्टेशन, ३५० मीटर लांबीचा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121