निसर्ग चक्रीवादळानंतर मंडणगडमध्ये प्रथमच गिधाडांचे दर्शन

    14-Jul-2020
Total Views | 239
vultures _1  H

 

 
वादळानंतर गिधाडे परतू लागली
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - कोकण किनारपट्टीला बसलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर प्रथमच मंडणगड तालुक्यात आज गिधाडांचे दर्शन घडले. शिपोळे बंदरानजीक खाडीजवळ ही गिधाडे एका मृत जनावराच्या शरीराजवळ आढळून आली. स्थानिकांच्या मते, साधारण तीस वर्षांनंतर मंडणगड तालुक्यात गिधाडे आढळून आली आहेत.
 
 

vultures _1  H  
 (छायाचित्रे - मोहन उपाध्ये) 
 
 
गेल्या महिन्यात कोकण किनारपट्टीवरील रायगड - रत्नागिरीला धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका इथल्या पक्षीवैभवाला बसला होता. रायगड जिल्ह्यातील म्हसाळा आणि श्रीवर्धन तालुक्याच्या आसपासच्या क्षेत्रात गिधाडांचा अधिवास आहे. यापरिसरात पांढऱ्या पाठीची आणि लांब चोचीची गिधाडे आढळतात. नारळ, आंबा, पुनई (जंगली बदाम), साकवीण, वनभेंड, अर्जुन यांसारख्या मोठ्या झाडांवर ते वास्तव्य करतात. मात्र, निसर्ग चक्रीवादळामुळे गिधाडांची घरटी नष्ट झाल्याचे निरीक्षण 'सिस्केप' संस्थेच्या कार्येकर्त्यांनी नोंदवले होते. त्यानंतर आता ही गिधाडे पुन्हा एकदा या परिसरात परतू लागली आहेत.
 
 
 
 
 
 
आज सकाळी मंडणगड तालुक्यातील शिपोळे बंदराजवळील खाडीनजीक काही गिधाडे वेळासचे कासवमित्र मोहन उपाध्ये यांना आढळून आली. पांढऱ्या पाठीची चौदा ते पंधरा गिधाडे याठिकाणी मृत बैलाचे शरीर खात असल्याची माहिती त्यांनी दिली. मंडणगड तालुक्यातील या परिसरात साधारण तीस वर्षांपूर्वी गिधाडांची घरटी होती. मधल्या कालावधीत गिधाडांचे दर्शन झाले नव्हते. मात्र, आज मृत जनावराचे शरीर खाण्याच्या निमित्ताने ही गिधाडे याठिकाणी आल्याचे त्यांनी सांगितले. 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121