पालघर साधू हत्या प्रकरणातील ११ आरोपींना कोरोनाची लागण

    16-Jun-2020
Total Views | 71
Palghar_1  H x

आरोपी वाडा पोलीस ठाण्याच्या न्यायालयीन कोठडीत होते अटकेत; वाडा पोलीस ठाणे राहणार बंद 

वाडा : पालघरमधील गडचिंचले साधू हत्याकाण्ड प्रकरणातील ११ आरोपींना कोरोनाची लागण झाल्याचे कोरोना चाचणीनंतर पुढे आले असून या कैद्यांच्या संपर्कात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया उशीरा पर्यंत सुरु होती.


गडचिंचले हत्याकांड प्रकरणातील १७ आरोपी न्यायालयीन कोठडीत वाडा पोलीस ठाण्यात अटकेत होते. तीन दिवसांपूर्वी या आरोपींना वाडा पोलीस ठाण्यात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. या आरोपींची कोरोना चाचणी केल्यानंतर १७ पैकी ११ जणांना कोरोना संसर्ग असल्याचे पुढे आले आहे. या कोरोना बाधीतआरोपींना न्यायालयाच्या परवानगीने वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती वाड्याचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली आहे. तर कोरोना बाधित कैद्यांच्या संपर्कात जे पोलिस कर्मचारी, अधिकारी आले आहेत त्यांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रीयाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


अकरा आरोपींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर वाडा पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. या आरोपींच्या संपर्कात आलेल्या पोलिसांच्याही आता चाचण्या करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. खबरदारी म्हणून वाडा पोलीस ठाणे दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाडा पोलीस ठाण्याला लागूनच तहसीलदार कार्यालय असून ते कार्यालयही दोन दिवस बंद राहणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121