मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता नववी आणि अकरावीच्या दुसर्या सत्रातील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, दहावीचा भुगोलाचा शिल्लक असलेला पेपर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
दहावीची परीक्षा सुरू असतानाच कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत शाळांना सुटी जाहीर करण्यात आली होती. यापूर्वी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र, नववीच्या विद्यार्थ्यांचे काय, असाही प्रश्न होता. तसेच अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या सत्रातील परिक्षाही बाकी होत्या. मात्र, आजच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
अकरावीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रात मिळालेल्या गुणांकनानुसार, पुढील वर्गासाठी पात्र ठरवण्यात येईल. दहावीचा भुगोल आणि कार्यशिक्षण या दोन परीक्षांबद्दलही महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ, पुणे यांच्या नियमावलीनुसार, पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहीती वर्षा गायकवाड यांनी दिली,