संकटाच्या काळात असंवेदनशीलता दाखवू नका : राजेश टोपे

    27-Mar-2020
Total Views | 56

rajesh tope_1  



मुंबई
: राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा १३५वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे ज्यांना कोरोनाची लागण झाली होती त्यांचा आजार बराही झाला आहे. कोरोना बरा होतो हे लक्षात घेण्याची गरज आहे, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. गुरूवारी झालेल्या बैठकीत आम्ही महत्त्वाच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. संकटाच्या काळात डॉक्टरांनी रुग्णालये, क्लिनिक बंद करून असंवेदनशीलता दाखवू नये, अस आवाहनही त्यांनी राज्यातील खासगी डॉक्टरांना केले आहे.

अनेक ठिकाणी अनेक खाजगी रुग्णालये भीतीपोटी बंद केलेत. हे अयोग्य आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर हे देवासमान असतात. डॉक्टरांनी आपली रूग्णालये सुरू ठेवावी, आपण अशा परिस्थितीत असंवेदनशीलता दाखवली तर सामान्य जनतेने कोणाकडे जावे ? असा सवाल टोपे यांनी केला. आम्ही सर्वांना सुचित केले आहे रूग्णालये सुरू राहतील. कोणालाही त्रास होणार नाही. डॉक्टरांनी आपली रूग्णालये सुरू ठेवावी. कोरोना बाजूला ठेवावा. त्याव्यतिरिक्त आणखीही आजार आहेत. काही आपात्कालिन परिस्थितीत जर कोणाला काही मदत हवी असेल तर त्यांनी कोणाकडे जावे. त्यांनी आपली क्लिनिकही सुरू ठेवावी, असे टोपे म्हणाले.
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121