इंदुरीकर महाराजांना सायबर सेलचा दिलासा ; कारवाई होणार नाही

    25-Feb-2020
Total Views | 83

indurikar_1  H



अहमदनगर :
प्रसिद्ध कितर्नकार ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंदुरीकर महाराज यांच्या त्या वादग्रस्त किर्तनाचा व्हिडीओ यूटयूबवर उपलब्ध नसल्याचा अहवाल सायबर सेलने दिला आहे. इंदुरीकर महाराज यांच्यावर कीर्तन करताना एक वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप होता. त्यावरुन आरोग्य विभागाने त्यांना नोटीसही पाठवली होती. परंतु आपण कितर्नात असे कुठलेही वादग्रस्त वक्तव्य केले नव्हते असे इंदुरीकर महाराज म्हणाले होते.



आरोग्य विभागाने पाठवलेल्या नोटिशीला इंदुरीकर महाराजांनी शेवटच्या दिवशी वकिलांमार्फत उत्तर दिले. “मी ते वाक्य बोललोच नाही. मी असं कीर्तन केलेच नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मी अहमदनगर जिल्ह्यात कीर्तनच केले नाही. मी समाज प्रबोधन करत असल्याने मला महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी पुरस्कार मिळाला आहे. तसेच इतर ठिकाणाहून देखील पुरस्कार मिळाले आहेत. युट्युबला आम्ही काही टाकत नाही आणि रेकॉर्डिंग देखील करत नाही,” असा खुलासा इंदुरीकर महाराजांनी केला होता.



निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराज यांनी ओझर येथे केलेल्या किर्तनात वादग्रस्त विधान केलं होते. त्या वक्तव्यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तशी तक्रार अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सकांडे करण्यात आली होती. तक्रारीनंतर आरोग्य विभागाने इंदुरीकर महाराजांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
"सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,' असे विधान ओझर येथे झालेल्या किर्तनात त्यांनी केलं होत. त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेतल्यानं घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी नगरमध्ये पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन इंदुरीकर महाराजांविरोधात लेखी तक्रार दिली होती. त्यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी देखील त्यांनी केली होती.
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121