अॅट्रॉसिटी सुधारणा कायद्याला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

    10-Feb-2020
Total Views | 65

SC atrocity_1  
नवी दिल्ली : अनुसूचित जाती - जमाती (एससी/एसटी) अधिनियमातील सरकारच्या २०१८ मधील दुरुस्तीवर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या कायद्याला हिरवा कंदील मिळाला आहे. 'अॅकट्रॉसिटी कायद्यांतर्गत तक्रारी केल्यावर प्राथमिक चौकशी करणे आवश्यक नाही. एफआयआर नोंदविण्यापूर्वी वरिष्ठ अधिकार्यांंची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही," अशी दुरुस्ती केंद्र सरकारने केली होती. त्याला आता न्यायालयानेदेखील मंजुरी दिली आहे. त्यामुळे हा कायदा आणखी कडक झाला आहे.
 
न्यायाधीश अरुण मिश्रा, न्यायाधीश विनीत शरण आणि न्यायाधीश रवींद्र भट्ट यांच्या खंडपीठाने एससी एसटी सुधारणा कायद्याला मंजुरी दिली. या कायद्याला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावताना सवोचच न्यायालयाने या कायद्यांतर्गत तत्काळ अटक करणे आणि अंतरिम जामीन नाकारणे या तरतुदी कायम राखल्या आहेत. केंद्र सरकारने एससी-एसटी कायद्यात सुधारणा करत एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर त्याला अंतरिम जामीन देण्यावर प्रतिबंध केला आहे.
 
एससी / एसटी कायदा प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन तरतूद आधी उपलब्ध होती. तीही या नव्या दुरुस्तीत रद्द केली आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये न्यायालये एफआयआर रद्द करू शकतात. केंद्र सरकारने ही दुरुस्ती केल्यानंतर त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर न्यायालयाने काही दुरुस्त्यांना स्थगिती दिली होती. मात्र आता न्यायालयाने आपलाच निर्णय फिरवला असून या दुरुस्तीला मान्यता दिली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121