महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची एनडीआरएफकडून सुटका

    27-Jul-2019
Total Views | 124

 

 
 
मुंबई : गेल्या २४ तासांपासून मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली याभागात जोरदार पाऊस कोसळतो आहे. मुसळधार पावसामुळे उल्हासनदीला दुथडी भरुन वाहू लागली आहे. अंबरनाथ आणि उल्हासनगर तसेच बदलापूर या ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साठलं आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे आणि अजूनही सुरु असलेल्या पावसामुळे कल्याण ते कर्जत रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही स्थानकांवर तसेच कल्याण स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे.
 
 

काल रात्री महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांची एनडीआरएफकडून सुटका करण्यात आली. लोकलमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना सोडवण्यासाठी पोलीस आणि एनडीआरएफच्या पथकाने रात्रीपासून मदतकार्य सुरु केले आहे. मध्य रेल्वेने यासंदर्भातली माहिती दिली आहे. रेल्वेमध्ये जे प्रवासी अडकून पडले होते त्यांना सोडवण्यात आले असून त्यांना जवळच्या प्लॅटफॉर्मवर आणले गेले. एनडीआरएफ आणि नौदलाच्या मदतीने अडकलेल्या सुमारे अकराशे प्रवाश्यांची सुटका केली. मुसळधार पावसाने मदत कार्यात वारंवार अडथळे येत होते त्याची तमा न बाळगता जवानांप्रमाणेच पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी देखील चोख कामगिरी बजावली.

नागरिकांच्या सुरक्षेततेसाठी एनडीआरएफच्या मदतीला नौदलाची एक टीमही घटनास्थळी उपस्थित झाली आहे. सोबतच नौदलाचे एक हेलिकॉप्टरही तैनात आहे. सुरुवातीला महिला आणि लहान मुलांना बोटीच्या सहाय्याने रेल्वेतून सुरक्षित स्थळी पोहचवण्यात येते आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि पुरुषांनाही हलवण्यात येईल. रेल्वेतून जवानांनी बोटीतून प्रवाश्यांना सुखरूप उतरवले यात काही वृद्ध , आजारी पुरुष महिला प्रवासी देखील होते , एनडीएफ आणि ग्रामस्थांमुळे आम्ही सुखरूप आहोत, कल्याण सोडल्यानंतर अंबरनाथला गाडी यायला किमान तीन तासाचा कालावधी लागला.

गाडी अंबरनाथ रेल्वे स्थानकामध्येही थांबवण्यात आली होती, बदलापूरच्या पुढे लोहमार्गात पावसाचे पाणी साचले आहे अशी अनाउन्समेंट अंबरनाथला केली असताना गाडी बदलापूरच्या पुढे का नेली असा संतप्त सवाल काही प्रवाशांनी उपस्थित केला. याच गाडीतून काही गर्भवती महिला देखील प्रवास करत होत्या. काही वयस्कर आणि आजारी प्रवाश्यांचे सामान वाहून नेण्यास ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी सहकार्य केले.
 
 
 

24 तास मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा

मुंबई विभागात आज मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढचे २४ तास मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभुमीवर मुंबईतून उड्डाण घेणाऱ्या ७ फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. तर ८ फ्लाईट्सचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे शाळांच्या सुट्टीचा निर्णय हा त्या विभागातील मुख्याध्यापकांनी घ्यावा असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी केले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121