विंग कमांडर अभिनंदन यांची 'वीरचक्र'साठी शिफारस

    20-Apr-2019
Total Views | 35


 


नवी दिल्ली : पाकिस्तानचे एफ-१६ हे लढाऊ विमान पाडून शौर्य गाजवणारे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची भारतीय हवाईदल वीरचक्र या शौर्य पुरस्कारासाठी केंद्राकडे शिफारस करणार आहे. युद्धातील महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या तीन सर्वोच्च पुरस्कारांमध्ये वीरचक्र पुरस्काराची गणना होते. परमवीर चक्र, महावीर चक्र या पुरस्कारानंतर वीरचक्र हा तिसरा सर्वोच्च पुरस्कार आहे.

 

भारतीय हवाईदलाने पाकिस्तानातील बालाकोट येथे घुसून जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. भारताच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी दहशतवादी तळांवर बॉम्बवर्षाव केला होता. या कारवाईत भाग घेणाऱ्या १२ वैमानिकांची वायुसेना पदकासाठी शिफारस करण्यात येणार असून तसा निर्णय झाला असल्याचे सांगण्यात आले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ‘फेक नरेटिव्ह’ - कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण; भाजप नेत्यांनी केली उबाठा-मनसे मोर्चामागील ‘राजकारणा’ची पोलखोल

हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ‘फेक नरेटिव्ह’ - कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण; भाजप नेत्यांनी केली उबाठा-मनसे मोर्चामागील ‘राजकारणा’ची पोलखोल

“हिंदी सक्तीच्या मुद्दयावरून राज्यात फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, यासंदर्भातील वस्तुस्थिती जनमानसात आता पोहचत आहे. कारण कोणतीच बाब लपलेली नाही, कागदावरील सर्व बाबी उघड होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातच त्रिभाषा धोरणाच्या पद्धतीला मान्यता देण्यात आली होती. उलट तेव्हा असलेला ‘अनिवार्य’ हा शब्द हटवून हिंदीची सक्ती या सरकारने काढून टाकली आहे. त्यामुळे खरेतर फडणवीस सरकारचे ठाकरेंनी अभिनंदन केले पाहिजे”, असा टोला भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121