राष्ट्रवादीचे नऊ आमदार आमच्या संपर्कात : रणजितसिंह निंबाळकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2019
Total Views |
 

पंढरपूर : 'महाशिवआघाडी'त सत्तास्थापनेबद्दल अजूनही शाशंकता दिसत असताना रणजितसिंह निंबाळकर यांनी एक मोठा खुलासा केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नऊ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापनेचा दावा करणाऱ्या 'महाशिवआघाडी'ला हा धक्का बसण्याची शक्यता आहे.

 

रणजितसिंह निंबाळकर ओल्या दुष्काळाची पाहाणी करण्यासाठी गेले असता महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर त्यांना प्रश्नविचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे सूचक वक्तव्य केले. दरम्यान, नारायण राणे यांनीही यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत सत्तास्थापनेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे विधान केले होते.

 

'महाशिवआघाडी'तर्फे सत्तास्थापनेचा दावा करत असताना बैठकांतून काही ठोस तोडगा अद्याप निघाला नसल्याचे चित्र महाराष्ट्रात आहे. त्यामुळे नव्याने होऊ पाहत असलेल्या आघाडीला सरकार स्थिर ठेवण्याचेही आव्हान आहे. त्यातच रणजितसिंह निंबाळकर यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महाशिवआघाडीला सुरुंग लागतो की काय?, अशी शक्यता राजकीय वर्तूळात केली जात आहे. दरम्यान, भाजपचे सर्व आमदारांना आमच्या विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@