रा. स्व. संघाचे ३ हजार लोकांना आमंत्रण

    08-Sep-2018
Total Views | 15



नवी दिल्ली : 'भविष्यातील भारत : संघाची दृष्टी' या विषयावर रा. स्व संघाचे १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान दिल्लीतील विज्ञान भवन येथे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात देशभरातील जवळपास ३ हजार लोकांना आमंत्रित केले गेले असल्याची माहिती आहे. यामध्ये राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, निवृत्त सरकारी अधिकारी आणि धार्मिक नेत्यांचा समावेश आहे.

 

सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत हे तीन दिवसीय शिबिर होत असून 'भविष्यातील भारत: संघाचा दृष्टीकोण' या विषयावर मंथन होणार आहे. या तीन दिवसांच्या शिबिरात साधारण ८०० ते १००० लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, रा. स्व. संघाची विचारधारा आणि कार्यप्रणाली संघाबाहेरील लोकांना समजावी, विचारांचे आदानप्रदान व्हावे यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई लोकल अपघात : मृतांचा आकडा ८ वर; वाचा दिवसभरात काय घडलं?

मुंबई लोकल अपघात : मृतांचा आकडा ८ वर; वाचा दिवसभरात काय घडलं?

आठवड्याचा पहिलाच दिवस मध्य रेल्वेसाठी काळा दिवस ठरला आहे. कसारा-सीएसएमटी लोकल मार्गावरून प्रवास करणाऱ्या ८ जणांचा सोमवार दि.९ रोजी रुळावर पडून मृत्यू झाला आहे. कसाऱ्याकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून नऊ ते दहा प्रवासी खाली पडले आणि त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवार, दि. ९ रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. "सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली होती. मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान ही घडली. फूटबोर्डवर उभ्या असलेल्या या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121