राजीव गांधी उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला

    05-Sep-2018
Total Views | 51


 
               
  पुलाच्या पाहणीची कपिल पाटील यांच्याकडून सूचना

भिवंडी : शहरातील राजीव गांधी उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्याची घटना बुधवारी घडली. पुलावरील दोन्ही बाजूंची वाहतूक थांबविण्यात आली असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शहरातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी २००६ साली हा पूल बांधण्यात आला होता

 

भिवंडी शहरातील मुख्य रस्त्यावरील राजीव गांधी उड्डाणपुलाची आयआयटीच्या तज्ज्ञांकडून पाहणी करावी, अशी सुचना भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी केली आहे. शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने पुलाची तातडीने दुरुस्ती करावी. परंतु, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने तज्ज्ञांकडून पाहणी आवश्यक असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले.

 

राजीव गांधी उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्यानंतर भिवंडीत खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने पुलावरील वाहतूक बंद केली. त्यानंतर शहरात भीषण वाहतूककोंडी झाली. यापार्श्वभूमीवर खासदार कपिल पाटील यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर तातडीने अधिकाऱ्याचे पथक भिवंडीत दाखल झाले. खासदार कपिल पाटील, महापौर जावेद दळवी, पोलिस उपायुक्त अंकित गोयल, महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांच्याबरोबर एमएमआरडीए व महापालिकेच्या अधिकाऱ्यानी पुलाची पाहणी केली. “शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने पूल महत्वपूर्ण आहे. त्यामुळे या पुलाची तातडीने तात्पुरती दुरुस्ती करावी. मात्र, प्रवाशांची सुरक्षिततता लक्षात घेऊन पुलाच्या स्थितीबाबत आयआयटीच्या तज्ज्ञांकडून अहवाल घ्यावा”, अशी सुचना खासदार कपिल पाटील यांनी केली.

अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121