शुक्रवारपासून मान्सून पुन्हा एकदा होणार सक्रीय

    03-Jul-2018
Total Views | 15


पुणे : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून येत्या शुक्रवारपासून पुन्हा एकदा संपूर्ण राज्यभर सक्रीय होणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकण आणि मुंबई महानगराच्या भागात सुरु असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भ यासर्व ठिकाणी मान्सून सक्रीय होणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मान्सूनमध्ये खंड पडला होता. परंतु तरी देखील अधूनमधून पाऊसाची रिपरिप सुरु होती. पण येत्या शुक्रवारपासून सर्व ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात होईल, असे वेधशाळेने सांगितले आहे.

दरम्यान कालपासून मुंबई महानगरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये संपूर्ण भारतामध्ये मेघालयातील चेरापुंजीनंतर मुंबईमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईमध्ये गेल्या २४ तासांमध्ये तब्बल १३१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाला सुरुवात होईल.
अग्रलेख
जरुर वाचा
आणीबाणीतील अत्याचारांबाबत काँग्रेस माफी कधी मागणार? – माजी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचा सवाल

आणीबाणीतील अत्याचारांबाबत काँग्रेस माफी कधी मागणार? – माजी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचा सवाल

"लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस म्हणजे आणीबाणी. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केवळ आपली खुर्ची वाचवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेशिवाय देशावर आणीबाणी लादली. त्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांपासून पत्रकारांपर्यंत, कार्यकर्त्यांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत अनेकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य गमावले. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या अत्याचारांबाबत काँग्रेसने आजवर एकदाही देशाची माफी मागितलेली नाही. आता तरी काँग्रेसला ती सुबुद्धी सुचेल का?" असा सवाल माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121