तानसा अभयारण्यातील पर्यटकांना खुणावणारा टँगो धबधबा

    21-Jul-2018
Total Views | 58

शहापूर : शहापूर तालुका म्हटला की, निसर्गाने मुक्त हस्ते केलेली सौंदर्याची उधळण या ठिकाणी पाहायला मिळते. कसारा घाट, घाटघर, आजा पर्वत, किल्ले माहुली, जांभे धरण, अशोका धबधबा तसेच भातसा, तानसा, मोडक सागर ही धरणे आणि याच परिसरात डोळ्यांचे पारणे फेडणारा निसर्गरम्य परिसर यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, गुजरातकडील पर्यटकांची पावले वळतात ती शहापूरकडे. यातच आता भर पडली आहे, ती तानसा अभयारण्यातील टँगो धबधब्याची. तानसा अभयारण्यात मोडकसागर ते तानसा असा जो रस्ता जातो त्या ठिकाणी बेलवड गावाच्या पुढे घनदाट झाडीमध्ये हा धबधबा जणू काही लपलेला आहे. या रस्त्याने जाताना या धबधब्याच्या आवाजानेच वाहनचालकांचा गाडीला ब्रेक लागतो व हा धबधबा पाहण्याचा मोह त्यांना आवरता येत नाही. या परिसरात पर्यटकांना तानसा अभयारण्याची भटकंती करता येते. रानभाज्या जवळून पाहता येतात. अभयारण्य असल्यामुळे पक्षांचे वेगवेगळे आवाज कानी ऐकू येतात. कधी ही न पाहिलेले पक्षी नजरेत पडतात. मोडकसागर धरण व तानसा धरण हे देखील भरून वाहू लागल्यामुळे पर्यटकांना सदर धरणे पाहण्याची संधीदेखील मिळते. तानसा धरणाच्या बँक वॉटरला मासेमारी करणार्या आदिवासींच्या तराफ्यावरून धरणात फेरफटका मारण्याचा आनंद घेता येतो, विशेष म्हणजे निसर्ग अभ्यासकांना तसेच छायाचित्रकारांना आणि पर्यटकांसाठी टँगो धबधबा पर्वणीच ठरत आहे.
 
कसे पोहचाल
 
आपण जर मध्य रेल्वेने किंवा मुंबई-आग्रा महामार्गाने प्रवास करत असाल, तर खर्डी किंवा आटगाव स्थानकावर उतरावे लागेल. आटगाव येथून प्रवाशी वाहतूक जीपने आठगाव ते अघई असा प्रवास करून रस्त्यात तानसा धरण व या धरणाचे बँक वॉटर पाहता येते. या ठिकाणावरून पुन्हा अघई ते बेलनाला प्रवास केल्यावर या ठिकाणी पोहचता येते. आटगाव ते टँगो धबधबा हे अंतर २८ कि.मी. आहे.
 
तसेच खर्डी वरून प्रवाशी वाहतुकीने जीपने टेंभा येथे जावे लागते आणि या ठिकाणी असलेल्या मोडकसागर धरणाला भेट देऊन पुन्हा टेंभा, बेलवड मार्गे टँगो धबधब्यावर पोहचता येते. खर्डी ते टँगो धबधबा अंतर २० किलो मीटर आहे, तसेच पालघर मार्गे येणार्या पर्यटकांना वाडा मार्गे सोनाळे, कलंभे, बेलवड, असा प्रवास करून पोहचता येते. वाडा ते टँगो धबधबा अंतर हे २४ किमी आहे. हे ठिकाण जंगलात असल्यामुळे खाण्यापिण्याची व्यवस्था या ठिकाणी नाही म्हणून पर्यटकांनी दिवसभराचे खाद्य आपल्या सोबत घेऊन जावे.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121