कल्याणमधील खड्ड्यांमुळे आणखी एकाचा बळी

    13-Jul-2018
Total Views | 6

आतापर्यंत पाच जणांनी गमावले प्राण; प्रशासन मात्र गप्प


 
 
कल्याण (ठाणे ) : कल्याणमधील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे सुरु असलेले वाहनचालकांच्या मृत्यूचे सत्र काही केल्या थांबायला तयार नाही. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आज आणखी एकाला आपला प्राण गमवावा लागला असून खड्ड्यांमुळे आतापर्यंत एकूण पाच जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. परंतु अजूनही प्रशासन मात्र यावर कसल्याही प्रकारची कारवाई करता दिसून येत नाही.
कल्याणमधील गांधारी पुलाजवळ आज सकाळी ही घटना घडली आहे. गांधारी पुलाजवळ एक युवक दुचाकीवर बापगोणकडे जात असताना रस्त्यामध्ये असलेल्या एका खड्ड्यांमध्ये त्याची दुचाकी आदळली. त्यामुळे तोल जाऊन युवक खाली कोसळला. इतक्या मागून येणाऱ्या एका ट्रकने संबंधित दुचाकीस्वाराला चिरडल्यामुळे त्याला आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे कल्याणमधील रस्ते हे मृत्यूचे सापळे बनले असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान गेल्या दोन आठवड्यांमध्ये आणखी चार जणांना अशाप्रकारे आपला जीव गमवावा लागला आहे. पावसामुळे कल्याणमधील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून यावरून वाहन चालवताना अनेकांची मोठी कसरत होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सातत्यने अपघात होत आहेत. अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागत आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
१ली १८ वर्षाखालील मुले व मुलींची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा - हरिद्वार २०२५ - महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी सलामी

१ली १८ वर्षाखालील मुले व मुलींची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा - हरिद्वार २०२५ - महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी सलामी

महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी "१ल्या १८वर्षाखालील मुले व मुलींच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. प्रेमनगर आश्रम, राणीपूर जवळ, हरिद्वार, उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या मुलींच्या इ गटात महाराष्ट्राने झारखंडवर ५०-१६ अशी सहज मात करीत साखळीत पहिल्या विजयाची नोंद केली. आक्रमक सुरुवात करीत महाराष्ट्राने पूर्वार्धात ३५-१० अशी भक्कम आघाडी घेत आपला विजय निश्र्चित केला. उत्तरार्धात त्याच जोशात खेळ करीत गुणांचे अर्धशतक गाठले. बिदिशा सोनार, सेरेना म्हसकर यांचा चढायांचा झंझावात थोपविणे झारखंडला जमले नाही. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121