जाधव यांच्या अधिकारांसाठी सरकार कटीबद्ध : परराष्ट्र मंत्रालय

    18-Apr-2018
Total Views | 18


नवी दिल्ली : कथित हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने अटक केलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या अधिकाऱ्यांच्या रक्षणा भारत सरकार पूर्णपणे कटीबद्ध असून यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असे स्पष्टीकरण भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहे. कुलभूषण जाधव प्रकरणी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाखल केलेल्या दुसऱ्या प्रतिज्ञापत्रावर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाने वरील आश्वासन दिले आहे.

पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करून जाधव यांना अटक केली. तसेच परस्पर त्यांच्यावर सुनावणी करून त्यांना शिक्षा देखील दिली. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्याने एकदा देखील भारताला कळवले नाही, यावरून पाकिस्तानची खरी मानसिकता काय आहे, हे कळून येते. परंतु भारत सरकार जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करेल, असे आश्वासन परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गेल्या १७ जानेवारीला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला दिलेल्या निर्देशानुसार भारताने आपले दुसरे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केले आहे. यामध्ये पाकिस्तान गेल्या डिसेंबर महिन्यात दाखल केलेल्या आपल्या स्पष्टीकरणाला भारताने प्रत्युत्तर दिले आहे. तसेच जाधव यांच्या अटकेप्रसंगी पाकिस्तानने कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियमांचा विचार केला होता ? असा प्रश्न भारताने विचारला आहे. यावर पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी न्यायालयाने येत्या जुलै महिन्यांची मुद्दत दिली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121