सौर ऊर्जेचा वापर करून १७० विद्यार्थ्यांनी शिजवली मॅगी

    13-Nov-2018
Total Views | 26



 
 
 

 सेवा सहयोग फाऊंडेशन समुत्कर्ष अभ्यासिका यांचा उपक्रम 

 

खानिवडे : सेवा सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच ग्लेफिन केमिकल्स प्रा. लि यांच्या सौजन्याने खानिवडे, सकवार व भारोळ या गावातील आठ आदिवासी पाड्यांमध्ये यावर्षीपासून समुत्कर्ष अभ्यासिका सुरु करण्यात आल्या आहेत. यासाठी याच गावातील शिक्षित महिला किंवा पुरुष यांची निवड करण्यात आली. हे शिक्षित गावकरी या पाड्यांतील विद्यार्थ्यांची अभ्यासिका रोज संध्याकाळी ६ ते ९ यावेळेत घेण्यात येते. या अभ्यासिकांमधून विध्यार्थ्यांना अभ्यास तर शिकविला जातोच. पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमही घेण्यात येतात.

 

खेळ, व्यायाम, खेळाद्वारे अभ्यास, सामान्य ज्ञान यांसह गणित, विज्ञान व इंग्रजी इत्यादी विषय या उपक्रमांच्या माध्यमातून शिकवले जातात. याच बरोबर विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासही साधण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून दिवाळीत एक दिवसीय तर उन्हाळयात तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून एक दिवसीय दिवाळी शिबीराचे आयोजन वसई पूर्व भागातील भारोळ गावात करण्यात आले होते. भारोळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हे शिबिर भरविण्यात आले होते. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ या वेळेत हे शिबिर घेण्यात आले.

 

सौर ऊर्जेचे महत्व विध्यार्थ्यांना समजावे, यासाठी प्रयोग म्हणून या शिबिराच्या सकाळच्या सत्रात सोलर सीटच्या माध्यमातून १७० विद्यार्थ्यांनी मॅगी शिजवली. याच बरोबर दिवसभर झालेल्या कार्यक्रमात विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. यामध्ये देश भक्तिपर गीते स्पर्धा, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवण्याच्या स्पर्धा, निबंध स्पर्धा, सांस्कृतिक व पारंपरिक गीते व नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संघाचे दयानंद कुडू, आरंभ संस्थेचे गणेश दाते, अमृता पुरंदरे, फाउंडेशनच्या दीपाली देवळे, उमेश सावंत व मुख्याध्यापक निलेश वैती हे उपस्थित होते. तसेच कांदिवलीच्या राजेंद्र पाल महाविद्यालयाचे विध्यार्थी स्वयंसेवक म्हणून उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121