मुंबई : ( Jyoti Malhotra )पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रा ही सध्या भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. अटकेनंतर तपासादरम्यान ज्योतीविषयी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता तिची एक डायरी तपासयंत्रणांच्या हाती लागली आहे. या डायरीची काही पानं माध्यमांमधून समोर आली आहेत. पाकिस्तानात फिरुन आल्यानंतर तिनं आपला अनुभव या डायरीत लिहून ठेवला होता. ही पानं वाचल्यानंतर ज्योती पाकिस्तानच्या प्रेमात असल्याचं वेगळं सांगण्याची गरज नाही.
या डायरीत तिने पाक दौऱ्याचे अनुभव लिहून ठेवले आहेत. ज्यात ती पाकिस्तानविषयी भरभरुन बोलली आहे. ती लिहिते की, "१० दिवस पाकिस्तान फिरल्यानंतर आज भारतात परतले. या दौऱ्यात पाकिस्तानच्या लोकांचं खूप प्रेम मिळालं. आमचे सबस्क्रायबर्स आणि मित्र देखील भेटायला आले. लाहोर फिरण्यासाठी दोन दिवसांचा वेळ कमी पडला. सीमांमुळे निर्माण झालेला दुरावा किती दिवस कायम राहणार? मात्र मनांमधली कटुता कमी झाली पाहिजे. आपली माती एकच आहे. नाळ एकच आहे. पाकिस्तान सरकारनं भारतीयांसाठी जास्तीत जास्त गुरुद्वारांचे आणि मंदिरांचे दारं उघडली पाहिजेत. १९४७ मध्ये फाळणीच्यावेळी दुरावलेल्या कुटुंबाला भेटता आलं पाहिजे. पाकिस्तानबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. क्रेजी आणि कलरफुल." या सगळ्यातून ज्योतीचं पाकप्रेम दिसून येत आहे. आणि याच प्रेमाचा परतावा देण्याचा प्रयत्न सुद्धा तिनं केला. मात्र या सगळ्यात ती भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात अडकली.
काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ही डायरी २०१२ सालची आहे. त्यामुळे २०१२ पासून ती पाकिस्तानच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. या डायरीतून तिचा ओढा पाकिस्तानकडे असल्याचं स्पष्ट होत आहे. या सगळ्यातून आयएसआयने ज्योतीवर नजर ठेवून पैसा आणि इतर गोष्टींच आमिष दाखवत जाळ्यात ओढले आणि भारताविरोधातील कारवायांसाठी प्यादं म्हणून तिचा वापर केला, हे स्पष्ट झाले आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\