चला, तयारीला लागले पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ‘संविधान बचाव’ म्हणत, जनतेत भ्रमनिर्मिती केली होती. आता पाकिस्तान आणि युद्धबंदी याबद्दल लोकांना काहीही खोटेनाटे सांगत, मोदी आणि भाजप केंद्र सरकारची प्रतिमा मलिन करण्याचे काम सुरू करूया. आमचे दिल्लीचे आका राहुल गांधीसाहेब यांनी पहलगाम हल्ला आणि युद्ध तसेच युद्धबंदी यांवर संसदेचे विशेष सत्र बोलवण्याची मागणी केली. त्यामुळे त्यांना खूश करण्यासाठी वांद्य्राच्या साहेबांचा लेफ्ट हॅण्ड-राईट हॅण्ड म्हणून मी विचारतो आहे.
सांगा, अमेरिका आणि भारतामध्ये युद्धबंदी आधी नेमका काय करार झाला, हे भारताला समजणे गरजेचे आहे. मी आणि आमचे वांद्य्राचे साहेब पूर्वी सारखे म्हणायचे की, “आम्ही म्हणजे महाराष्ट्र. आता आम्ही काय म्हणतोय हे भारताला समजणे गरजेचे आहे.” काय तो मुत्सद्दीपणा आमच्या शब्दांत! असे बोलून आम्ही सगळ्या देशाला सांगितले की, आम्ही थेट भारताचे प्रतिनिधित्व करतो आहोत. काय म्हणता? आमच्या गुरूंनी बारामतीच्या काकासाहेबांनी दिल्लीच्या आकांविरोधात भूमिका घेतली? काय म्हणता, पहलगाम हल्ला, पाकिस्तान युद्ध, युद्धबंदी यांविषयी विशेष सत्र बोलावू नये, असे ते म्हणतात? आता काय करावे? कुठे जावे? दिल्लीचे शहेनशहा की बारामतीचे साहेब? दोघांचेही चरणकमल आमच्यासाठी मोलाचे. पण, बारामतीच्या काकासाहेबांना पण कळतच की, मोदी आणि भाजप कधी राममंदिर, कधी सीएए, कधी ‘वक्फ बोर्ड’चा विषय घेतात; मग देश त्यांच्या नव्याने प्रेमात पडतो आणि आमची जी काय आघाडी होती ती हरते. त्यामुळे युद्धबंदीबाबत लोकांमध्ये गैरसमज पसरवणे, चिथावणी देणे गरजेचे आहे.
काय म्हणता, युद्ध आणि युद्धबंदी हा विषय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. काय म्हणता, पाकिस्तानची युद्धात सपशेल हार झाली. सगळ्या जगाने पाहिले तरी पाकिस्तानी जनता आणि नेतेही त्यांच्या पराजयाचे नाही, तर खोट्या विजयाचे गुणगाण गातात. दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी, आमच्या सैन्याने देशाला गौरव प्राप्त करून दिला तरीसुद्धा आम्ही त्यांच्या विरोधात स्वार्थासाठी प्रश्न उपस्थित करतोे. ही एकप्रकारे देशाशी वंचना आहे?” असू दे, शेवटी सत्ता महत्त्वाची! त्यासाठी आम्ही युद्धबंदीविरोधात लोकांमध्ये भ्रम पसरवणारच! देश सुरक्षा, लोककल्याण हे सगळे विषय भाजपवाल्यांचे-मोदींचे, आमचे नव्हेत. आम्हाला सत्तेशी देणे-घेणे. समजले का?
हिंदूंना जाग येणार का?
मुर्शिदाबाद येथे ‘वक्फ बोर्ड’चे समर्थन करणार्या काही धर्मांध मुसलमानांनी हिंसक दंगल घडवली होती. त्यामध्ये आंदोलनाच्या नावावर हिंदूंची घरे, दुकाने यांच्यावर हल्ले केले होते. हिंदूंसोबत होणारी हिंसा, अत्याचार हे अत्यंत दुःखदायक होते. अन्यायग्रस्त हिंदूंना न्याय देताना ममता बॅनर्जींचे सरकार अपयशी ठरले. याविरोधात धैर्याने पुढे येत काही लोकांनी आवाज उठवला. ‘हिंदूंना न्याय द्या’ म्हणत, त्यांनी ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी लक्षात आणून दिली. त्यामध्ये बेलडांगा इथल्या ‘भारत सेवाश्रम संघा’चे साधू कार्तिक महाराजही होते. त्यांनी ममता बॅनर्जी यांना मुर्शिदाबाद दंगलीबाबत आणि त्यावरच्या कारवाईबाबत प्रश्न विचारले. ‘भारत सेवाश्रम संघा’चे कल्याणकारी काम प. बंगालमध्ये सर्वश्रुत आहे. त्याच सेवाश्रमाच्या साधूंनी कार्तिकी महाराजांनी हिंदूंवर होणार्या अत्याचाराची वाच्यता केली. मात्र, कार्तिकी महाराजांनी दंगलीबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर न देता, ममता बॅनर्जींच्या तृणमूल सरकारने ‘भारत सेवाश्रम संघा’ची सुरक्षा प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने हटवली आहे.
हे सेवाश्रम तसेच यातील साधुगण धर्मांध दंगेखोरांच्या हिंसेला बळी पडले, तर याला जबाबदार कोण? हा प्रश्न ममता यांना पडला नाही. कारण, आजवरची त्यांची कारकीर्द म्हणजे हिंदूंना तुच्छ लेखून त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक द्यायची हीच आहे. सत्ता मिळवण्यासाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करणे, हे एकमेव काम त्या आणि त्यांचे सरकार करत असते. अर्थात, प. बंगालचे अधिकृत निवासी मुस्लीम हे भारतीय नागरिक असल्याने त्यांच्यासाठी ममता यांनी काम केले, तर एकवेळ ठीक आहे. पण, हिंदूंवर अन्याय, अत्याचार उघड्या डोळ्यांनी पाहणे आणि हिंदूंवर अत्याचार करणार्यांना सूट देणे, हे कसे काय योग्य असेल? ममता नेमके हेच करत आहेत. प. बंगालचे विरोधी पक्षनेता, भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांनी म्हटले आहे की, “मुर्शिदाबाद हिंसेच्या घटनेअंतर्गत ममता सरकार निर्दोष हिंदू युवकांवर कारवाई करत आहे. त्यांचा गुन्हा काय, तर त्यांनी दंगलीमध्ये अत्याचार झालेल्या हिंदूंबाबत आवाज उठवला! ममता बॅनर्जींचा हा हिंदूद्वेष कधी संपणार? नव्हे, दुसरीकडे प.बंगालच्या हिंदूंना जाग कधी येणार?”