"शिवसेनेच्या जन्मापासूनच ठाकरेंनी..."; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

    28-Aug-2024
Total Views | 200
 
Rane & Thackeray
 
सिंधुदुर्ग : शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूत्व या दोन विषयांना उदरनिर्वाहाचं साधन बनवलं, असा घणाघात खासदार नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. बुधवारी महाविकास आघाडीकडून राजकोट किल्ल्यावर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप आणि मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. त्यानंतर नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली.
 
नारायण राणे म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही घटना अतिशय दुर्दैवी घटना होती. आठ महिन्यांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. ऐन पावळ्यात हवामान खराब असल्याने हा पुतळा कोसळला आहे. हा पुतळा ज्यांनी बांधला त्यांची चौकशी व्हावी आणि नक्की कशामुळे हा पुतळा कोसळला याचं कारण बाहेर आणून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी जनतेची इच्छा आहे. पण निवडणूका समोर असल्याने काही विरोधक याचं भांडवल करत आहेत. या जिल्ह्यात त्यांना भाजपवर टीका करण्यासाठी कोणतंही कारण मिळत नसल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याचं निमित्त करून ते टीका करत आहेत. आज आलेल्या पुढाऱ्यांपैकी एखादा राष्ट्रपुरुषाचा पुतळा, एखादी शाळा, बालवाडी किंवा धार्मिक स्थळ उभारण्यात एकाचंही योगदान नाही. आमच्या सरकारवर आरोप करण्यापलिकडे त्यांच्याकडे दुसरं कामच नाही," असा टोला त्यांनी लगावला.
 
हे वाचलंत का? -  मालवणमधील पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ १ सप्टेंबरला मविआचं आंदोलन!
 
ते पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरे आम्हाला शिवद्रोही म्हणतात. त्यांच्याकडून चांगल्या भाषेची अपेक्षाच नाही. शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूत्व या दोन विषयांना त्यांनी उदरनिर्वाहाचं साधन बनवलं. पण एकतरी पुतळा उभारला का? त्यांनी स्वत:च्या वडिलांचा पुतळाही सरकारच्या खर्चाने उभारला. त्यामुळे त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही," असेही ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
महिला सक्षमीकरणातूनच राष्ट्राची उन्नती : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत , सोलापूरात उद्योगवर्धिनी संस्थेचा

महिला सक्षमीकरणातूनच राष्ट्राची उन्नती : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत , सोलापूरात उद्योगवर्धिनी संस्थेचा 'परिवार उत्सव' कार्यक्रम संपन्न

"वात्सल्याचे वरदान असलेल्या मातृशक्तीत समाजाच्या उद्धाराचा विचार स्वाभाविकपणे असतो. त्यामुळेच ही शक्ती उभी राहील्यानंतर राष्ट्राची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही", असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केला. महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या उद्योगवर्धिनी संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे गुरुवार, दि. १७ जुलै रोजी 'परिवार उत्सव' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव एनएफडीसी - नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव एनएफडीसी - नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथे 'भारत पॅव्हेलियन'चे करणार उद्घाटन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय माहिती व प्रसारण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव येत्या १८ जुलै २०२५ रोजी मुंबईतील एनएफडीसी कॉम्प्लेक्समधील नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (NMIC) येथील गुलशन महलमध्ये भारत पॅव्हेलियनचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव राजेश कुमार मीणा आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कथाकथनाची..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121