"दुसऱ्याचं संरक्षण घेऊन 'अगं बाई अरेच्चा' करणं हेच राऊतांचं काम!"

    02-Apr-2024
Total Views | 44

Sanjay Raut 
 
मुंबई : दुसऱ्याचं संरक्षण घेऊन 'अगं बाई अरेच्चा' करणं हेच संजय राऊतांचं काम आहे, असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावला आहे. संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला आता शेलारांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
 
आशिष शेलार म्हणाले की, "जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांमध्ये नाव असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अतिशय हीन आणि टवाळकीच्या भाषेत टीका करणे ही उबाठा सेनेची संस्कृती आहे. मराठी माणूस आणि महाराष्ट्र हा सुसंस्कृत म्हणून ओळखला जातो. त्यामुळे असभ्य आणि असंस्कृत बोलणाऱ्यांना महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने कधीही स्थान दिलेले नाही."
 
हे वाचलंत का? -  "उबाठा गटाच्या घराला..."; शिरसाटांचा राऊतांना टोला
 
"संजय राऊतांना दिवसाढवळ्या आणि उद्धवजींनी दिवसरात्र केवळ एकाच जननेत्याची भीती वाटते, ते म्हणजे मोदीजी. याचं कारण म्हणजे त्यांना महाराष्ट्राचं जनसमर्थन आहे. अशा असभ्य आणि हीन भाषेत बोलणाऱ्या राऊतांचा आम्ही धिक्कार करतो. त्यांच्या भाषेत बोलायचंच झालं तर त्यांच्यापेक्षाही भयंकर मी बोलू शकतो. कारण मी कोकणी, मालवणी आणि मराठी आहे. माझ्या मालवणी भाषेतले शब्द संजय राऊतांना पटणारे नाहीत," असे ते म्हणाले.
 
"मराठी सिनेमातल्या कुणाची उपाधी द्यायची झाली तर संजय राऊतांना महाराष्ट्राच्या राजकीय पटावरचे गणपत पाटील म्हणता येईल. याचं कारण म्हणजे त्यांची कुठलीही गोष्ट स्वत:ची नाही. ते ना निवडणूक स्वत:हून लढले, ना कधी लोकांमध्ये जाऊन मतं मागितली. नेहमी दुसऱ्याचं संरक्षण घेऊन अगं बाई अरेच्चा करायचं आणि असभ्य बोलायचं, एवढंच ते करतात. त्यामुळे ज्या भाषेत तुमचे राजकीय प्रवक्ते बोलत आहेत ती तुम्हाला मान्य आहे का, असा माझा उद्धवजींना सवाल आहे," असेही ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
महिला सक्षमीकरणातूनच राष्ट्राची उन्नती : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत , सोलापूरात उद्योगवर्धिनी संस्थेचा

महिला सक्षमीकरणातूनच राष्ट्राची उन्नती : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत , सोलापूरात उद्योगवर्धिनी संस्थेचा 'परिवार उत्सव' कार्यक्रम संपन्न

"वात्सल्याचे वरदान असलेल्या मातृशक्तीत समाजाच्या उद्धाराचा विचार स्वाभाविकपणे असतो. त्यामुळेच ही शक्ती उभी राहील्यानंतर राष्ट्राची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही", असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केला. महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या उद्योगवर्धिनी संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे गुरुवार, दि. १७ जुलै रोजी 'परिवार उत्सव' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव एनएफडीसी - नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव एनएफडीसी - नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथे 'भारत पॅव्हेलियन'चे करणार उद्घाटन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय माहिती व प्रसारण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव येत्या १८ जुलै २०२५ रोजी मुंबईतील एनएफडीसी कॉम्प्लेक्समधील नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (NMIC) येथील गुलशन महलमध्ये भारत पॅव्हेलियनचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव राजेश कुमार मीणा आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कथाकथनाची..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121