करिना, तब्बू व क्रितीच्या 'क्रू'ने पहिल्याच दिवशी गाजवले बॉक्स ऑफिस

    30-Mar-2024
Total Views | 86
एकता कपूर निर्मित ‘क्रु’ चित्रपटाने बऱ्याच काळानंतर हिंदी चित्रपटसृष्टीला पहिल्याच दिवशी चांगले दिवस दाखवले आहेत.
 

crew  
 
मुंबई : एकता कपूर निर्मित आणि राजेश ए. कृष्णन दिग्दर्शित ‘क्रु’ (Crew Movie) चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी हॅट्रिक केली आहे. तब्बू, करीना कपूर खान, क्रिती सेनॉन यांचा ‘क्रू’ चित्रपट पहिल्याच दिवशी इतकी कमाई करणारा पहिला महिलांचा चित्रपट ठरला आहे. २९ मार्च 'गुड फ्रायडे' च्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला तब्बल २५०० स्क्रीन्स मिळाल्या होत्या. ‘क्रु’ (Crew Movie) चित्रपटाची कथा तीन एअर होस्टेसची असून ज्यांच्या आयुष्यातील समस्या, आर्थिक अडचणी आणि त्यातून होणारी धमाल दाखवण्यात आली आहे. जाणून घेऊयात पहिल्याच दिवशी या चित्रपटाने किती कमाई केली आहे.
 
 
 
'क्रू'ची कमाई
 
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या वर्षात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपेक्षा या हिंदी चित्रपटाने ओपनिंग डेला चांगली कमाई केली आहे. पहिल्या दिवशी ‘क्रु’ ने ९.२५ कोटी, दुसऱ्या दिवशी ४.७ कोटी कमवत आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण १३.३२ कोटी कमावले आहेत.तर जगभरात या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २० कोटी कमावले आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121