"ठाकरेंचा प्रस्ताव अपरिपक्व आणि हास्यास्पद"- नितीन गडकरींनी साधला ठाकरेंवर निशाणा

    13-Mar-2024
Total Views | 112

NITIN GADKARI

 

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, "नितीन गडकरींनी आमच्याकडे यावे. आम्ही त्यांना निवडून आणू" उद्धव ठाकरेंच्या याच प्रस्तावावर उत्तर देताना गडकरींनी ठाकरेंना चांगलेच फैलावर घेतले आहे.
 
मंगळवारी, दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी द्वारका द्रुतगती मार्गाचा १९ किमी लांबीचा हरियाणा विभाग लोकांसाठी खुला करण्यासाठी आयोजित कार्यक्रमादरम्यान 'पीटीआय'शी बोलताना त्यांनी ठाकरेंच्या प्रस्तावावर भाष्य केले. ते म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांची काळजी करण्याची गरज नाही. ठाकरे यांची सूचना अपरिपक्व आणि हास्यास्पद आहे. भाजपमध्ये उमेदवारांना तिकीट देण्याची व्यवस्था आहे.''
 
 
नितीन गडकरी यांना महाविकास आघाडीकडून प्रस्ताव देताना उद्धव ठाकरे म्हणालो होते की, "गडकरींनी 'महाराष्ट्राची क्षमता' दाखवून 'दिल्लीसमोर झुकण्याऐवजी' राजीनामा द्यावा. “आम्ही महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून त्यांचा विजय निश्चित करू.” ठाकरेंच्या याचं प्रस्तावावर प्रश्न विचारा असता नितीन गडकरींनी भाजप ४०० हून अधिक जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला.
 
भाजपने लोकसभा निवडणुकांच्या घोषणाआधीच १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. या यादीत महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाचा समावेश नव्हता. यावरुन ठाकरेंनी भाजपवर गडकरींना डावल्याचा आरोप केला होता. यावर उत्तर देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते की, महाराष्ट्राची यादी घोषित होताच, त्यात पहिले नाव नितीन गडकरी यांचे असेल.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121