१०० कोटी हिंदूंना मंदिर – मठापर्यंत आणणार ‘मंदिर सेतू’

    02-Jul-2025   
Total Views | 10

नवी दिल्ली
: विजयादशमीपर्यंत देशातील १०० कोटी हिंदूंना सहकुटुंब मंदिरे, मठ आणि अन्य श्रद्धास्थानांमध्ये आणण्याचा संकल्प महाराष्ट्रातील ‘मंदिर सेतू’ या संस्थेने मंगळवारी अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरापासून सोडला आहे.

‘मंदिर सेतू’ अमित कुमार, पराग शेंडे, नितीन काळे यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांची भेट घेतली आणि या मोठ्या मोहिमेची माहिती दिली. यावेळी चंपतराय यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी श्रीरामललाचे दर्शन घेऊन आपल्या संकल्पाचा प्रारंभ केला.

देशातील सर्व भागांमध्ये ही मोहिम राबविण्यात येणार असून दुर्गापूजा आणि श्रीरामलीला आयोजन समित्यांना देखील या मोहिमेशी जोडून घेतले जाणार आहे. त्यासाठी विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि सामाजिक संघटनांच्या प्रमुखांशी चर्चा सुरू आहे. सर्वांकडून संमती पत्रे घेतल्यानंतर ते देशाच्या कानाकोपऱ्यात संदेश पसरवतील आणि विजयादशमीपर्यंत जवळच्या श्रद्धा केंद्रांवर हिंदू कुटुंबांकडून १०० कोटी प्रार्थना करण्याचे लक्ष्य साध्य करतील.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121