मनोज जरांगे पाटीलांची तब्येत खालावली; रुग्णालयात दाखल

    17-Sep-2023
Total Views | 284


जरांगे


मुंबई :
गेला महिनाभर महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे वादळ सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जालन्याच्या अंतरवली सरटी गावात आंदोलक तब्बल १७ दिवस उपोषणाला बसले होते. मात्र उपोषण संपून आज तीन दिवसानंतर जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेतून जालन्याहून थेट छत्रपती संभाजीनगरला नेण्यात आले आहे.
 
आंदोलनाच्या १७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर त्यांच्याच हस्ते सरबत पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना चांगल्या दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यास सांगितले होते. तेव्हा जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता.
 
 
उपोषणा दरम्यान १७ दिवस केवळ पाणी पिऊन उपोषण केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला आहे. सध्या छत्रपती संभाजीनगरमधील गॅलक्सी रुग्णालय त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात येताना त्यांनी रुग्णवाहिकेतूनच आंदोलकांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, उपचार घेण्यासंदर्भात मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. उपचार घेतल्यानंतर परत मी उपोषण स्थळी जाणार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
क्षमापत्र नाही, चित्रपट प्रदर्शित होणार नाही; कमल हसन यांचा कर्नाटकमध्ये ठाम निर्णय!

"क्षमापत्र नाही, चित्रपट प्रदर्शित होणार नाही"; कमल हसन यांचा कर्नाटकमध्ये ठाम निर्णय!

"कन्नड भाषा तमिळमधून जन्मली" या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता कमल हसन यांनी मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयात स्पष्ट केलं की, त्यांच्या आगामी थग लाईफ या चित्रपटाचा कर्नाटकमधील प्रदर्शन सध्या स्थगित करण्यात आला असून, त्यांनी कोणतेही क्षमापत्र देण्याची आवश्यकता नाही असं त्यांचं मत आहे. या वक्तव्यानंतर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटलं की, "तुम्ही कितीही मोठे कलाकार असलात, तरी जनतेच्या भावना दुखावण्याचा तुम्हाला अधिकार नाही." एका साध्या क्षमापत्रामुळे हा वाद मिटू शकला ..

भुस्खलनामुळे अडकले महाराष्ट्रातील ४० पर्यटक!

भुस्खलनामुळे अडकले महाराष्ट्रातील ४० पर्यटक!

अतिवृष्टी आणि तिष्टा नदीला पूर आल्याने सिक्कीम लॅचुंग येथे भुस्खलनाची घटना घडली. या ठिकाणी महाराष्ट्रातील ४० पर्यटक अडकले होते. या घटनेसंदर्भात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सिक्कीम येथील आपत्कालीन कार्य केंद्राशी तात्काळ संपर्क साधण्यात आला. या संदर्भात सिक्कीम प्रशासन यांनी सूचना/ अॅडवायजरी निर्गमित केल्या आहेत. याविषयी महाराष्ट्र सदन येथील निवासी आयुक्त यांनी सिक्कीम प्रशासनाशी संपर्क साधला. सद्य:स्थितीत पाऊस थांबला असल्याने नॉर्थ सिक्कीम ते गंगटोक रस्ता चालू झाला आहे. रस्ता सुरू झाल्याने अडकलेल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121