आता शासकीय पत्रव्यवहारांत होणार शिवराज्याभिषेक बोधचिन्हाचा वापर!

    25-Jul-2023
Total Views | 967

Shiva Rajyabhishek emblem
 
 
मुंबई : यंदा शिवराज्याभिषेकास ३५० वे वर्ष सुरू झाले असून, दुर्गराज रायगडावर सरकारकडून विविध कार्यक्रम झाले. महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी शिवराज्याभिषेकाचा सोहळा दिमाखात साजरा झाला. याच पार्श्वभुमीवर आता शासनातर्फे वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांच्या प्रचार व प्रसिद्धीसह शासकीय पत्रव्यवहारांत ३५० व्या शिवराज्याभिषेकानिमित्त साकारलेल्या विशेष बोधचिन्हाचा वापर करण्यात येणार आहे.
 
शिवछत्रपतींच्या विचारांचा जागर लोकांच्या मनामनांत व्हावा, जगभरात जेथे मराठी माणूस आहे, तेथे छत्रपतींचा विचार तसेच त्यांच्याबद्दलची माहिती पोहोचावी, हा या मागील उद्देश्य आहे. शासनाच्या कार्यक्रमांच्या प्रचार, प्रसिद्धीसह पत्रव्यवहारांत त्याचा वापर केले जाणार आहे. तसेच बोधचिन्ह शासकीय कार्यालयांत दर्शनी भागात चित्रित करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राष्ट्रहिताच्या विचारांनी ‘आयटीआय’मध्ये साजरा होणार शिवराज्याभिषेक दिन

राष्ट्रहिताच्या विचारांनी ‘आयटीआय’मध्ये साजरा होणार शिवराज्याभिषेक दिन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत कौशल्य विकास विभागाच्या वतीने येत्या दि. ६ जूनपासून राज्यातल्या सर्व आयटीआय संस्थांमध्ये राष्ट्रभक्तीच्या विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये भारताचा जाज्वल्य इतिहास आणि देशासाठी समर्पणाची भावना रुजावी, पर्यावरण संवर्धनाची भावना जागृत व्हावी, या हेतूने या व्याख्यानमालेचे आयोजन केल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बुधवार, दि. ४ जून रोजी मंत्रालय..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121