पोषण अभियान : लोकचळवळीच्या माध्यमातून वर्तन बदल

    29-Sep-2022
Total Views | 72
पोषण भारत
 
पोषण अभियान  
 
पोषणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, आहाराच्या चांगल्या सवयी लावून घेणारा बदल वागणुकीत घडवून आणण्याबाबत लोकजागृती वाढवण्यासाठी ‘पोषण अभियानां’तर्गत लोकचळवळीचा भाग म्हणून वेळोवेळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सप्टेंबर महिन्यांत चार ‘पोषण मास’ आणि मार्च महिन्यांत चार ‘पोषण पंधरवडे’ झाले आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे.
 
 
'सुपोषित भारत’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा साकार करण्याची संधी ‘प्राईम मिनिस्टर्स ओवरआर्चिंग स्कीम फॉर होलिस्टिक न्युट्रिशन’ अर्थात ‘पोषण अभियाना’मार्फत उपलब्ध झाली आहे. लहान मुले, गर्भवती महिला आणि स्तनपान देणार्यार माता यांच्या आहारातील पोषणतत्त्वे वाढवण्याच्या उद्देशाने भारत सरकारने ‘पोषण अभियाना’ला सुरुवात केली. तळागाळातील समुदायांमध्ये जागरूकता निर्माण करणे, पिढ्यान्पिढ्या कुपोषणाला कारणीभूत ठरल्या आहेत अशा त्यांच्या काही गैरसमजुती असतील, तर त्या दूर करणे व त्यानुसार वागणुकीत बदल घडवून आणणे, या ‘पोषण अभियाना’समोरील आव्हानात्मक बाबी आहेत. वागणुकीत बदल घडवून आणण्यासाठी करावयाच्या नियोजित उपक्रमांमध्ये सामुदायिक कार्यक्रमांचे आयोजन, माहिती, शिक्षण व संवाद, पोषक आहाराचे समर्थन आणि लोकचळवळीत मोठ्या प्रमाणावर लोकांना सहभागी करून घेणे यांचा समावेश आहे.
 
 
वर्ष २०२१-२२च्या अर्थसंकल्पात ‘पोषण अभियाना’चा हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने ‘मिशन पोषण २.०’ (सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.०)ची घोषणा करण्यात आली. पोषणाला साहाय्यक ठरेल अशा या एकात्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आहाराच्या आरोग्यदायी सवयी, कुपोषणाला आळा घालण्यासाठी व रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक वागणूक अंगवळणी पडेल, असा उद्देश त्यामागे आहे.
 
 
वागणुकीत व पर्यायाने समाजात बदल घडवून आणण्यासाठी संवादावर या कार्यक्रमाचा भर असून त्यातून लोकचळवळीचा पाया मजबूत करण्याचा हेतू आहे. युद्धपातळीवर कृतिशील होऊन कुपोषण रोखण्याचा आणि सुयोग्य पोषण साध्य करण्यावर अभियान लक्ष केंद्रित करत आहे.
 
 
लोकजागृती आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी वागणुकीत बदल घडवून आणण्यासाठी अभियानामार्फत सातत्याने वर्षभर प्रयत्न करण्यात येतील. या प्रयत्नांचा भाग म्हणून विविध व्यासपीठांवरून पोषणाविषयी संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यात येतील. समुदायांना व विशेषतः मातांना आरोग्यदायी आहाराच्या सवयी लावून घेण्याकरिता प्रोत्साहन मिळावे म्हणून सामुदायिक कार्यक्रमांबरोबर दरवर्षी ‘पोषण पंधरवडा’ व ‘पोषण मास’ यांचे आयोजन करण्यात येते.
 
 
अभियानांतर्गत प्रत्येक अंगणवाडीत महिन्यातून दोन वेळा ठरावीक दिवशी सामुदायिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये घरातील पुरुषांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘सुपोषण दिवस’, शाळेसाठी पूर्वतयारी, वयात येण्याचे साजरीकरण, हात धुण्याचे व स्वच्छतेच्या सवयींचे महत्त्व, सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व, पंडुरोगाला प्रतिबंध, पोषक आहाराचे महत्त्व, आहारातील विविधता इ. विषयांचा समावेश करण्यात आला आहे. अभियानाला सुरुवात झाल्यापासून देशभरातील अंगणवाड्यांमध्ये ३.७ कोटींपेक्षा जास्त सामुदायिक कार्यक्रम घेण्यात आले आहेत.
 
 
पोषणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, आहाराच्या चांगल्या सवयी लावून घेणारा बदल वागणुकीत घडवून आणण्याबाबत लोकजागृती वाढवण्यासाठी ‘पोषण अभियानां’तर्गत लोकचळवळीचा भाग म्हणून वेळोवेळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अभियानाला सुरुवात झाल्यापासून सप्टेंबर महिन्यांत चार ‘पोषण मास’ आणि मार्च महिन्यांत चार ‘पोषण पंधरवडे’ झाले आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. पोषण मेळे, प्रभात फेर्यान, शाळांमध्ये पोषण आहारविषयक सत्रे, स्वमदत गटांच्या बैठका, पंडुरोगविषयक शिबिरे, लहान मुलांच्या वाढीकडे लक्ष, आशा व अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी भेटी, ग्राम आरोग्य, स्वच्छता व पोषण दिवसांचे आयोजन आदी उपक्रम राबवण्यात आले आहेत.
 
 
आजवर आयोजित करण्यात आलेल्या पोषण मास व पंधरवड्यांमध्ये संबंधित मंत्रालये, राज्ये व केंद्रशासित प्रदेश आणि क्षेत्रीय अधिकार्यां नी उत्साहाने व मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला आहे. आघाडीवरील कर्मचारी, समुदाय, तालुका व जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचारी, राज्यांची मंत्रालये व विभागांनी पोषण अभियानांतर्गत लोकचळवळीची व्याप्ती वाढवण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. चौथ्या ‘राष्ट्रीय पोषण मास २०२१’ अंतर्गत २०.३२ कोटी उपक्रम राबवण्यात आले. यंदा २१ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत आयोजित ‘पोषण पंधरवड्या’त लोकसहभागातून २.९६ कोटी उपक्रम घेण्यात आले.
 
 
पोषणाखेरीज एकूणच चांगले आरोग्य आणि आरोग्यदायी सवयींचे महत्त्व ‘पोषण अभियाना’च्या लाभार्थींना मासिक सत्रांमार्फत सांगण्यात येते. ‘राष्ट्रीय आरोग्य अभियानां’तर्गत ‘ग्राम आरोग्य’ आणि ‘पोषण दिवसा’ची संकल्पना अस्तित्वात आली. २००७ पासून ही संकल्पना देशात सामुदायिक व्यासपीठांवर साकारली जात आहे; त्यातून समुदायांना आरोग्यसेवांशी जोडून घेणे शक्य झाले आहे. बालवयातील विकास, पोषण आणि स्वच्छताविषयक सेवांना दारोदारी नेण्याचा व त्यातून आरोग्यपूर्ण समाज निर्माण करण्यासाठी लोकसहभाग वाढवण्याचा या संकल्पनेचा हेतू आहे.
 
 
समुदायांच्या आहारातील विविधतेविषयी लोकजागृती करण्यासाठी आणि हे वैविध्य वाढवण्यासाठी कुपोषित मुलांना वेगवेगळ्या आहार गटांचा पुरवठा करण्यासाठी ‘पोषण वाटिका’ उभारण्यात आल्या आहेत. त्यामध्ये स्थानिक, ऋतूमानानुसार खाद्यान्नाची निर्मिती करण्यात येते. सेंद्रिय पद्धतीने भाज्या, फळे वाढवून त्यातून पोषणतत्त्वांचा पुरवठा साध्य करणे हा या पोषण वाटिकांचा मुख्य हेतू आहे. आयुष मंत्रालयाच्या साहाय्याने करण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमांच्या माध्यमातून २१ जिल्ह्यांमध्ये औषधी वनस्पतींची १.१० लाख रोपे लावण्यात आली. तसेच, ४.३७ लाख अंगणवाड्यांच्या स्वतःच्या पोषण वाटिका तयार झाल्या आहेत.
 
 
पाचव्या ‘राष्ट्रीय पोषण मासा’ची संकल्पना आहे ‘लोकचळवळीकडून लोकसहभागाकडे’; ग्रामपंचायतींनी ‘पोषण पंचायत’ अशी भूमिका घेऊन कुपोषणावर मात करण्यासाठी आवश्यक संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे यात अपेक्षित आहे. पोषण पंचायतींच्या मुख्य उद्देशांमध्ये ‘महिला आणि आरोग्य’ व ‘मूल आणि शिक्षण’ या दोन बाबींचा समावेश आहे. पोषण आणि आरोग्यदायी सवयींचा प्रसार करण्यासाठी ‘राष्ट्रीय पोषण मास’ हे व्यासपीठ असून त्याद्वारे पोषण अभियानाची सर्वसमावेशक उद्दिष्टे साध्य करावयाची आहेत.
 
 
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५’ अलीकडेच प्रकाशित झाला. त्यानुसार, वर्ष २०१५-१६ मधील ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-४’ अहवालातील आकडेवारीच्या तुलनेत या वर्षीच्या अहवालात भारतात पोषण विषयक निर्देशांकांमध्ये सुधारणा दिसून येत आहे. अहवालातील आकडेवारीनुसार, मुलांच्या खुरट्या वाढीची टक्केवारी ३८.४ टक्क्यांवरून घसरून ३५.५ टक्के इतकी झाली आहे. अशक्तपणाचे प्रमाण कमी होऊन २१ टक्क्यांवरून १९.३ टक्क्यांवर आले आहे. वजन कमी असण्याचे प्रमाण ३५.८ टक्क्यांवरून ३२.१ टक्क्यांवर आले आहे. तसेच, १५ ते ४९ वर्षे वयोगटातील महिलांमध्ये शरीर द्रव्यमान सूचकांक (बॉडी मास इंडेक्स) सामान्यापेक्षा कमी असल्याच्या टक्केवारीत घट झाली आहे; पूर्वीच्या २२.९ टक्क्यांऐवजी ती १८.७ टक्के झाली आहे.
 
 
सर्वसमावेशक आरोग्यपूर्ण देशाच्या उभारणीचा उदात्त हेतू बाळगून सुरू झालेल्या ‘पोषण अभियाना’ला लहान मुलांच्या माता, कुमारवयीन मुली, गर्भवती व स्तनपान देणार्याह महिला, कुटुंबातील इतर महिला व पुरुष सदस्य, आशा, अंगणवाडी सेविका आदी आरोग्य सेविका आणि एकूणच समुदायाला पोषण आहार व आरोग्यदायी सवयींचे महत्त्व लक्षात येणे व त्यानुसार वागणुकीत बदल घडून येणे अपेक्षित आहे. त्याकरिता सामुदायिक पातळीवर उपाययोजना, लोकसहभाग वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा अभियानाचा मानस आहे. सकारात्मक, आरोग्यदायी वागणुकीचा प्रचार, प्रसार आरोग्यपूर्ण समाज घडवण्यासाठी आवश्यक आहे, अशा वागणुकीचे जनतेने कायम आचरण करण्यात ‘पोषण अभियाना’चे यश आहे.
 
 
 -डॉ. मुंजपारा महेंद्रभाई
(लेखक केंद्रीय महिला व बालविकास आणि आयुष राज्यमंत्री आहेत.)
अग्रलेख
जरुर वाचा
इराणचा इस्रायलवर पलटवार! तेल अवीव, जेरुसलेमसह अनेक शहरांवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे

इराणचा इस्रायलवर पलटवार! तेल अवीव, जेरुसलेमसह अनेक शहरांवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे

(Iran Strikes 150 Missiles on Israel) इस्रायलने शुक्रवारी दि. १३ जून रोजी पहाटे इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर रात्री इराणनेही इस्रायलवर मोठा हल्ला करत चोख प्रत्युत्तर दिले आहे. इराणने या हल्ल्यात इस्रायलमधील अनेक शहरांवर शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. इराणने या प्रत्युत्तरात्मक कारवाईला 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3' असे नाव दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने तेल अवीव व जेरुसलेम या दोन मोठ्या शहरांना लक्ष्य करण्यात आले आहे. इराणी लष्कराने इस्रायलवर १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागल्याचे वृत्त इस्रायलमधील एका वृत्तप..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121