पुन्हा मास्कसक्ती? पुन्हा निर्बंध! कोरोनाची लाट येण्याची शक्यता! केंद्राचा राज्यांना अलर्ट

    21-Dec-2022
Total Views | 59
 
corona alert
 
 
 
 
मुंबई : चीनमधील कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या धडकी भरवणारी आहे. चीनशिवाय इतर काही देशांमध्येही कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून केंद्र सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी आज उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दर आठवड्याला कोरोनाची रिव्ह्युव्ह मिटिंग घेणार असल्याचंही म्हटलं आहे. तर महत्त्चाचं म्हणजे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला केंद्र सरकाने दिला आहे.
 
 
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, "जपान, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कोरिया, रिपब्लिक ऑफ कोरिया, ब्राझील आणि चीनमध्ये अचानक वाढलेली कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता, भारतीय सार्स-कोव्ह -2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (इन्साकोगॉगियम) च्या माध्यमातून व्हेरिएंटचा मागोवा घेण्यासाठी सकारात्मक प्रकरणांच्या नमुन्यांचे संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग तयार कराव्या. यामुळे देशात पसरणाऱ्या नवीन व्हेरिएंट्सचा वेळीच शोध घेता येईल आणि त्यासाठी आवश्यक आरोग्यविषयक उपाययोजना हाती घेणे सुलभ होईल.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121